मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, May 12, 2013

हेरंब कुळकर्णी व नीलेश निमकर -- दोन शिक्षण कार्यकर्ते

हेरंब कुळकर्णी व नीलेश निमकर -- दोन शिक्षण कार्यकर्ते


प्रिय हेरंब ,

तुमचे आवाहन मिळाले. असर अहवालाच्या माहिती गोळा करण्याच्या पद्धतीबाबत माझ्या मनात शंका असल्या तरी त्या निमित्ताने मुलांच्या लेखन वाचनाबाबतचा मुद्दा समोर आला हे चांगले झालेअसे मला वाटाते. तुमच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही मुद्दे पुढे मांडत आहे. 

 वाचन-लेखन म्हणज़े शिक्षण नव्हे असे म्हणेणे मला नुसते चुकीचे नाही तर दुटप्पीपणाचे  वाटते. औपचारिक शिक्षणाच्या निरूपयोगितेवर 'सप्रमाणचर्चा करणारी मंडळी देखील आपल्या स्वत:च्या मुलांना त्यापासून लांब ठेऊ शकत नाहीत यातच सारे आले. त्यामुळे निदान  औपरिक प्राथमिक शिक्षण हा सर्वांचा हक्क मानला तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वयात ( साधारण दुसरीच्या शेवटी ) वाचन-लेखनावर उत्तम प्रभुत्त्व येणे अतिशय म्हत्त्वाचे आहे. कारण वाचन-लेखन आणि गणन येणे ही औपचारिक शिक्षणात यशस्वी होण्यासाठीची अटच आहे. वाचन-लेखनाचे हत्यार कमकुवत राहिले की समजेपेक्षा पाठांतराच्या आणि ते ही न जमल्यास कॉपी वगैरे गैर प्रकारांचा आधार घेऊन परिक्षा पास होणे याशिवाय दुसरा पर्याय मुलासमोर उरत नाही.ग्रामीण भागात काम करताना शिक्षकाच्या मदतीने कशीबशी कॉपी करत उत्तर पत्रिका लिहिणारा वर्गच्या वर्ग मी अनेकदा पाहतो. त्यातल्या अनेकांना आपण कॉपी करून काय लिहतो आहोत हे ही समजत नाही. अशा वेळी शहरी मध्यमवर्गीय नजरेतून या 'बेकायदेशीर'  कृत्याचा धिक्कार करायचा का या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपली नजर बदलायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मी वैयक्तिक पातळीवर दुसरा पर्याय निवडला आहे.माझ्या या निवडीचे प्रतिबिंब मी पुढे मांडत असलेल्या मुद्द्यांत खचितच पडेल असे मला वाटते. 
 मुलांच्या वाचन-लेखनातील अपयशामागच्या करणांवर आपल्याकडे होणारी चर्चा ही फार वरवरची असते असे माझे मत आहे.थोडेसे खोलात शिरण्याचा प्रयत्न केला तर तर 'तुम्ही फार तांत्रिक विचार करताअसा शेरा ऐकायला मिळून बोलणेच खुंटते असाही माझा अनुभव आहे.तरीही माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतो.
1.       लेखी भाषा वाचून समजून घेणे हेभाषा ऐकून समजून घेण्यापेक्षा बरेच वेगळे असते.भाषा ऐकून समजून घेताना आसपासच्या स्थळ-काळाचा संदर्भ, बोलणार्‍या व्यक्तीच्या आवाजातील चढ उतार, व्यक्तीचे हावभाव या सार्‍याची फारच मोठी मदत आपल्याला  होते. वाचून अर्थ लावताना अशी कोणतीच मदत मिळत नाही. शिवाय आपले बोलणे ऐकणार्‍याला  कळते आहे का नाही, याची बरीचशी काळज़ी वक्ता घेत असतो, न समजल्यासारखे वाटले तर पुन्हा सांगतो या सार्‍या सोयी वाचून अर्थ लावताना नाहीत. तिथे अर्थ समजून घेण्याची सगळी जवाबदारी वाचकाची ! त्या मुळे आधी लिहिलेल्या मजकुराचा अर्थ लावयचा आणि तो अर्थ बरोबर आहे का हे यावर सतत लक्ष ठेवाचे अशी गुंतागुंतीची दुहेरी प्रक्रिया वाचताना होत असते. अर्थातच नव्याने वाचन शिकणार्‍या मुलांसाठी आकलनाच्या दृष्टीने मोठी उडी असते. पढना है समझना ही NCERT ने तयार केलेली घोषणा मला पटते. कारण वाचन ही एक अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे.
2.       परिसरातली भाषा कानावर पडली की मूल आपसुकच ती शिकते. लेखी भाषेचे मात्र तसे नाही. काही तुरळक अपवाद वगळले तर बहुसंख्य मुलांना वाचायला आणि लिहायला शिकवावे लागते असा आपला सर्वांचाच अनुभव आहे. लेखी भाषा हे बोलण्याच्या भाषेचेच एक रूप आहे हे मुलाच्या लक्षात येणे ही फार मह्त्त्वाची पायरी आहे अनेकदा अक्षरे शिकणार्‍या मुलांना ती नेमके काय आणि कशासाठी शिकत आहेत याची जाणीवच नसते. अशा वेळी तो एक निरर्थक पाठांतराचा भाग बनतो. Emergent Literacy  या साक्षरतेशी संबंधित विचारधारेत मुलांची लेखी मजकुराची जाण कशी कशी विकसित होत जाते यावर बरेच काम पाश्चात्य देशात झाले आहे. दुर्दैवाने आपल्या भाषांत असे काम अजूनही मोठ्या प्रमाणावर झालेले नाही. अंकुरती साक्षरता या विषयीचा एक स्लाईड शो शिक्षक अभ्यास मंडळ या क्वेस्ट्च्या Online व्यासपीठावर उपलब्ध आहे. त्यात या विषयी काही चर्चा वाचायला मिळेल. या संकल्पनेचा वापर अगदी अंगणवाडीपासून व्हायला हवा. क्वेस्टच्या कामात आम्ही हा प्रयत्न करत आहोत.
3.       लेखी भाषा हे बोलण्याच्या भाषेचच एक रूप असते. मात्र जिथे मुलांची घरची भाषा व शाळेतील प्रमाण भाषा ( महाराष्ट्रात मराठी ) वेगळी असते तिथे घरच्या भाषेकडून शाळेच्या भाषेर्यंत पोहचण्याचा पूल बांधावा लागतो आणि तो ही घरच्या भाषेबद्दल न्यून गंड तयार होणार नाही याची काळज़ी घेऊन ! आदिवासी भाषा आणि प्रमाण मराठी यात बरेच अंतर असल्याने तिथे शिकवणार्‍या शिक्षक़ांना याची जाणीव असणे फारच म्हत्त्वाचे आहे. मुलांच्या घरच्या भाषेला शिक्षणात आदराचे स्थान देणे फारच गरजेचे आहे.  हे नेमके कसे करायचे या याबाबत काही काम अनुताई वाघ आणि सिंधुताई आंबिके यांनी केले होते. सध्या या दोन्ही भाषांत पूल कसा बांधता येईल यावर क्वेस्ट व प्रगत शिक्षण संस्थेत काही काम चालू आहे मात्र निश्चित ठोस काही सांगण्यासाठी कसलेल्या संशोधकाची आणि पर्यायाने संसाधनांची गरज आहे.
4.       बालसाहित्याची उपलब्धता हा मुलांच्या वाचनलेखनावर प्रभाव टाकणारा एक मह्त्त्वाचा घटक आहे. मराठीचा विचार करता आपण ज्याला बालसाहित्य म्हणतो ते खरेतर कुमार साहित्य असते. नुकतेच वाचायला लागलेल्या मुलांसाठी आपल्याकडे फारशी पुस्तके नाहीत ( एकलव्य ,तुलिका , प्रथम  यांच्यासारखे तुरळक अपवाद वगळता) आणि जी आहेत त्यातील चित्रे, भाषा , विषय सारे काही शहरी मध्यमवर्गीय मुलांच्या भावविश्वातले आहे. ग्रामीण मुलांच्या अनुभवांशी मिळतीजुळती अशी पुस्तके जवळजवळ नाहीतच. केवळ पाठ्यपुस्तकाची पाने वाचून वाचन लेखनावर प्रभुत्त्व येणे अशक्य आहे. आपल्या सर्वांना हे प्रभुत्त्व मिळवता आले यात घरात येणार्‍या पुस्तके , मासिके वर्तमान पत्रे यांचा फार मोठा वाटा आहे . त्यामुळे ग्रामीण मुलांना परवडेल अशा पुस्तकांची बाजारपेठ ( मी हा शब्द पूर्ण विचाराने वापरतो आहे !) विकसित होणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेत किमान पेटीतले वाचनालय असणे व शिक्षकांनी त्याचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे.
5.       वाचन लेखन कसे शिकवावे यावर विविध दृष्टीकोन दिसतात आपल्याचा विचार करून आरंभिक वाचन लेखन कसे शिकवावे याचे धोरण (केवळ  पाठ्यक्रम वा पाठ्यपुस्तके नव्हेत ) ठरवायला हवे असे धोरण ठरवताना लहानप्रमाणात मात्र सखोल झालेल्या कामाचा अभ्यास करायला हवा.आपल्याकडे अशा कामांची फुटक़ळ म्हणून हेटाळणी करण्यातच लोकांना धन्यता वाटते त्याला काय करणार ?विद्यापीठीय पातळीवर अजून हा विषय अभ्यासाचा आहे असे अपल्याला वाटत नाही. काही दशकांपूर्वी वाचन लेखनाबाबत आपल्यासारखीच  स्थिती अमेरिकेत होती. ती बदलण्यात विद्यापीठीय संशोधन विभागांचे मोठेच योगदान आहे,
6.       आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा.आरंभिक  वाचन-लेखन या विषयातील गुंतागुंतीची कल्पना आपल्या शिक्षकांना आहे का ? त्यांच्या सेवापूर्व वा सेवांतर्गत प्रशिक्षणात ही समज बनावी असा काही प्रयत्न केला जातो का ? याचे उत्तर, नाहीअसेच द्यावे लागेल. या विषयावर वाचायला मराठीत फारसे काही लिखाण नाही. खरेतर डीएडच्या अभ्यास्क्रम निर्मितीच्या वेळी यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी. तशी ती होताना दिसत नाही. या अजस्र आणि गुंतागुंतेच्या समस्येवर जादूच्या कांडीसारखा चालणारा उपाय नाही तर दीर्घ्रकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. शिक्षकांची या विषयाची समज तयार होईल अशा प्रकारचे प्रशिक्षण योजायला हवे. शिक्षकांसाठी चांगल्या वाचन साहित्याची निर्मिती करायला हवी. या दिशेने एक छोटेसे पाऊल म्हणून क्वेस्ट्ने आपल्या मर्यादित ताकदीत काही वाचन साहित्य व विडीओ फिल्म साईट वरून मोफत  उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच शिक्षक अभ्यास मंडळाच्या व्यासपीठावर चर्चा सुरू केली आहे त्याचा जरूर वापर करावा. वापर-कर्त्याने मूळ स्रोताचा उल्लेख करावा अशी माफक अपेक्षा आहे. पुढे काही लिंक देत आहे त्या जरूर पहाव्यात

कळावे
नीलेश निमकर
शिक्षक अभ्यास मंडळ http://forum.quest.org.in/
आरंभिक वाचन लेखन काही लेख http://www.quest.org.in/translated_resources
आरंभिक वाचन लेखन विडीओ फिल्मस http://quest.org.in/node/271
------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी बालसाहित्य कुठे आहे,कुठे जायला हवे

मराठी बालसाहित्य कुठे आहे,कुठे जायला हवे

USE USE

आकर्षण श्रीमंतीचे आणि दिशाभ्रम

आकर्षण श्रीमंतीचे आणि दिशाभ्रम

कौशल्य शिक्षणाला पर्याय नाही

कौशल्य शिक्षणाला पर्याय नाही

कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही
- लीना मेहेंदळे
एक दिवस सहजच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने प्रसिध्द केलेली निवडक शैक्षणिक सांख्यिकी 2002 - 03 वाचत बसले होते आणि खूप वर्षे मनांत खजबजत असणारा कौशल्य शिक्षणाच्या अभावाचा विचार पुन: मनांत दाटून आला.
जनगणनेतील आकडेवारी सांगते की महाराष्ट्रात 20 वर्षापर्यंत वय असणारी लोकसंख्या सुमारे 4 कोटी आहे.  म्हणजे ढोबळ मानाने प्रत्येक वर्षाच्या वयांतील मुला-मुलींची संस्था सुमारे वीस लाख.
त्या तुलनेत शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या किती ?  तर आठवीत अठरा लाख, नववीत सोळा लाख, दहावीत बारा लाख.  यापुढे अकरावीत आहे आठ लाख तर बारावीत साडे सात लाख.
म्हणजे अकरावी - बारावीचा विचार केला (वय वर्षे सोळा, सतरा) तर सोळा लाख विद्यार्थी शाळेत व तेवढेच (किंवा त्याहून जास्त) शाळेबाहेर.  उच्च माध्यमिक शिक्षणाचा विचार केला तरी आठवी, नववी व दहावी मिळून 46 लाख मुले शाळेत व 14 लाख शाळेबाहेर.
पण पहिली ते सातवीचा विचार केला तर मुला-मुलींची संख्या 140 लाख असतांना शाळेत मात्र 150 लाख विद्यार्थी पटावर आहेत असे आकडे दाखवतात.  यावरून नापास होऊन पुन:पुन्हा त्याच इयत्तेत बसणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण समजून येते.
थोडक्यात शाळेत जाण्याच्या वयांत असलेल्या मुलामुलींची संख्या व त्या तुलनेत प्रत्यक्ष शाळेत असणा-यांची संख्या यामध्ये 7 वी पर्यंत तरी महाराष्ट्रात समतोल दिसून येतो.
- 2 -
तरीही दहावी शिक्षणानंतर भवितव्य कांय हा प्रश्न कायमच रहातो.  अकरावी बारावीत दरवर्षी जेवढी मुले प्रवेश घेतात, तेवढीच मुले शाळेबाहेरच्या जगांत प्रवेश करतात.  ते करतांना त्यांच्या हातात कोणते कौशल्य असते ?  आयुष्यासाठी भाजी भाकरीचा प्रश्न सोडवण्याचे कोणते साधन असते ?
महाराष्ट्रासारख्या देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणा-या राज्यांतही दरवर्षी फक्त सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देण्याची सोय आहे.  यामध्ये अगदी 15 दिवसांचे लघुत्तम कोर्सेस ते ITI मधील 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स पर्यंत सर्व प्रकार व त्यातील विद्यार्थी मोजलेले आहेत. यातील खूप (?) विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण संपल्यासंपल्या कारखान्यात नोकरी मिळते असे व्यवसाय शिक्षण संचालक सांगतात, पण खूप म्हणजे किती ही आकडेवारी उपलब्ध नाहीे.  त्यांच्याकडे दरवर्षी खूप (?) बजेट असते (2007-08 या वर्षासाठी प्लान व नॉनप्लान मिळून सुमारे 580 कोटी रूपये) त्यामध्ये सालाबाद प्रमाणे 10 टक्के वाढ होणारच असते.  एवढा मर्यादित विचारच आतापर्यंत झालेला आहे.
पण व्यवसाय शिक्षण संचालन करणे म्हणजे फक्त कोर्सेस उघडण्याची परवानगी देऊन त्यासाठी पैसे देणे नव्हे. ?  व्यवसाय शिक्षणाची व्याप्ति किती मोठया प्रमाणावर वाढवायली हवी ?  या व्यवसाय प्रशिक्षित मुला-मुलींना कुठे मागणी आहे, त्या त्या क्षेत्रांत अजून किती मागणी आहे   आपल्या व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात काळानुरूप कांय फेरबद्दल हवेत ? सध्याच्या पध्दतीमधे  व्यवसाय  शिक्षणाचे  सिलॅबस तपासण्यासाठी जी  कमिटी आहे

- 3 -
तिच्याकडे एखादा विषय घेतला की नंतर सुमारे 8 वर्षांनंतरच ते पुन्हा अद्यायावत केले जाते.  मधल्या काळात त्या कोर्स मधील नवे तंत्र किती तरी पुढे गेलेले असते.
या व असल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आजही शिक्षण खात्याकडे नाहीत.  त्यांना अजून हे प्रश्नच सुचलेले नाहीत.  प्रत्यक्षांत मात्र अशा कित्येक कामांसाठी - शासनाने व्यवसाय शिक्षणाचे बजेट वाढवायची गरज आहे.  त्यांची एक जंत्रीच करता येईल.
1) कौशल्य शिक्षण हेच खरे जीवनाधाराचे शिक्षण आहे.  सबब हा सर्व बालकांचा मूलभूत हक्क समजला गेला पाहिजे.
2) महाराष्ट्राची लोकसंख्या दहा कोटी असून, त्यापैकी सुमारे दोन कोटी लोकसंख्या 11 ते 20 वयोगटातील आहेत व सुमारे अडिच कोटी लोकसंख्या 21 ते 35 वयोगटातील आहे.  या सर्व साडेचार कोटी जनतेला कौशल्य शिक्षणाची आवश्यकता आहे.
3) व्यवसाय शिक्षणासाठी सध्या सुमारे 125 कोटी रुपये योजनेंतर्गत व सुमारे 450 कोटी रुपये नॉन प्लॅनंतर्गत बजेट केले जाते.त्यामधून सुमारे एक लक्ष मुलामुलींना आय.आय.टी. प्रशिक्षण, सुमारे पन्नास हजार मुलामुलींना व्हॉकेशनल 10 वी व सुमारे एक लाख मुलामुलींना तीन ते अठरा महिन्याचे शॉर्ट कोर्सेसद्बारे कौशल्य शिक्षण दिले जाते.  ही व्याप्ति कित्येक पटींनी वाढवणे गरजेचे आहे.  या अडीच लाखांमध्ये 7 वी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या किती मुला-मुलींना लाभ मिळतो त्याची आकडेवारी तपासणे महत्त्वाचे आहे.
4) सुमारे 450 कोटी गरजु लोकसंख्येपैकी सध्या फक्त अडीच लाख व्यक्तींना व्यवसाय शिक्षण दिले जाते व त्याचा खर्च 575 कोटी आहे. यावरुन व्यवसाय शिक्षणासाठी कित्येक पटीने बजेट वाढवून घेणे गरजेचे आहे हे दिसून येईल.

- 4 -
5) सेवायोजन कार्यालयातील नोंदीवरुन असे दिसून येते की,
-     10 वी पास झालेले बारा लाख,
-     12 वी पास झालेले  दहा लाख,
-     ग्रॅज्युएट झालेले पाच लाख,
-     इतर सुशिक्षित तीन लाख.
असे चांगल्या त-हेने शिक्षण घेतलेले व इतरही बेरोजगार असलेले   तीस लाख युवक युवती आहेत. यावरुनही असे दिसून येते की, निव्वळ शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण पुरेसे नसून व्यवसाय शिक्षण अत्यावश्यक आहे.
6) सेवायोजन विभागाच्या आकडेवारीत असे ही दिसते की, दरवर्षी सुमारे साठ  हजार मुले-मुली नांवे नोंदवतात. परंतु त्यापैकी फक्त सुमारे पाच हजार व्यक्तींनाच नोकरीची संधी  उपलब्ध होते. म्हणूनच शासनाने येत्या वर्षी व्यवसाय शिक्षणावर मोठया प्रमाणावर  भर  दिला पाहिजे.
7) मात्र एकीकडे व्यवसाय शिक्षणाची व्याप्ती कित्येक पटीने वाढत असताना व्यवसाय शिक्षणाच्या पध्दतीबाबतही नवीन पध्दतीने व कल्पकता दाखवून योजनांची आखणी होणे गरजेचे आहे. तसेच कित्येक पूरक बाबीं या बजेटमधून हाती घेणे आवश्यक आहे :-
क)  व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश देताना पूर्व शिक्षणाची अट असू नये.  मागेल त्याला व्यवसाय शिक्षण असे नवीन धोरण ठरविण्यात यावे.
         ख)  ग्रामीण भागात कित्येक नवीन उद्योग विशेषत: कृषी आधारित व  ऊर्जा आधारित उद्योग येऊ लागले आहेत. यासाठी लागणारे कौशल्य शिक्षणाचे नवीन विषय व त्यांचे सिलॅबस तयार होणे गरजेचे आहे. सध्या सुमारे दीडशे
प्रकारचे व्यवसाय शिक्षणाचे कोर्सेस असून त्यांचा भर प्रामुख्याने शहरी भागातील गरजांवर केंद्रीत आहे.
       - 5 -
 ग) भटक्या विमुक्त जाती तसेच आदिवासी यांच्यासाठी त्यांच्या जीवनशैलीवर  आधारित नवीन व्यवसाय शिक्षणाचे कोर्सेस सुरु होणे आवश्यक आहे. उदा. क्रीडा शाळा, जंगली मध गोळा करणे, जंगली रेशीमकोश गोळा  करणे  इत्यादी.    
         घ) व्यवसाय शिक्षणाचे सिलॅबस अद्यावत करण्याची प्रक्रीया अत्यंत अपुरी असून सध्या कित्येक कोर्सेसचे नुतनीकरण करण्यासाठी सुमारे आठ वर्ष एवढा विलंबाचा कालावधी लागतो.  सबब त्या योजनेसाठी अधिक बजेट देऊन सर्व सिलॅबस  2-3 वर्षात सातत्याने अद्यावत करीत राहण्याची आवश्यकता आहे.
         ङ) व्यवसाय शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके मोठया प्रमाणावर मराठी भाषेत लिहून घेण्याची आवश्यकता आहे.
         च) व्यवसाय शिक्षण हा खर्चिक  प्रकार आहे.परंतु  Audio Visual माध्यमातून व्यवसाय शिक्षणासाठी  सामुग्री तयार करुन घेतल्यास हे प्रशिक्षण जास्त सुलभ होऊ शकते.  यासाठी मोठे बजेट देण्याची गरज आहे.
         छ)  व्यवसाय शिक्षणाच्या सिलाबसमध्ये (i) व्यक्तीमत्व विकास,
 ii) उद्योजकता  प्रशिक्षण,  iii) प्रोजेक्ट तयार करणे, iv) बँकां सोबतचा व्यवहार अशा चारही मुद्यांवर प्रशिक्षण न दिले गेल्यास निव्वळ तांत्रिक प्रशिक्षण हे अपुरे पडते. त्यामुळे या चारही  बाबींचे प्रशिक्षण व त्यासाठी पुरेशी व्यवस्था होणे आवश्यक आहे.
  वरील सर्व बाबींचा विचार केला तर व्यवसाय शिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी फार मोठी तरतूद असणे आवश्यक आहे / दिसून येते.  सबब 2008-09 साठी योजनांतर्गत सुमारे 500 कोटी वाढीव तरतूद व पुढील पाच


- 6 -
  वर्षात सुमारे पाच हजार कोटीची तरतूद करणे  गरजेचे आहे.  यामुळे राज्यातील बेरोजगारी तसेच वाढती गुन्हेगारी या दोन्ही समस्यांना आळा बसू शकेल.
आता आपल्या दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी संपून अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी सुरू होत आहे.  त्या निमित्ताने दिल्ली येथे भरलेल्या नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल च्या बैठकीत दिलेल्या भाषणांत आपल्या पंतप्रधानांनी व्यवसाय शिक्षणाची व्यापक गरज बोलून दाखवली.  सरकार मानवी संसाधनांवर (थोडक्यांत माणूस प्राण्याला घडविण्यावर) लक्ष केंद्रित करेल अस सांगितल.  यासाठी प्रत्यक्षांत व्यवसाय शिक्षणासाठी सध्या अत्यंत तुटपुंजी आर्थिक तरतूद आहे त्यांत वीसएक पटींनी वाढ करावी लागेल.  व्यवसाय शिक्षणाच्या प्रसार व प्रभावीपणासाठी कांय कांय करावे लागेल यावर अजून खोलवर विचार करावा लागेल.  NDC च्या Poilcy document मधे शिक्षण क्षेत्रासाठी कारणी घातलेल्या सुमारे 40 पानांच्या टिप्पणामधे व्यवसाय शिक्षणाबाबत फक्त 2 पाने ठेवलेली दिसतात त्यांची व्याप्ती वाढवावी लागेल.
================

New Strategy for Education

New Strategy for Education

शिक्षणाचे केंद्र हवे खेडे

शिक्षणाचे केंद्र हवे खेडे

शिक्षणाने आपल्याला काय द्यावे.

शिक्षणाने आपल्याला काय द्यावे.