मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, January 25, 2021

शिक्षण व्यवस्था -- नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच

 

शिक्षण व्यवस्था

नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच

देशातील समाज व्यवस्था बिघडली आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज उरलेली नाही. या बिघाडांचे पाढेही खूपदा वाचले गेले आहेत. भरमसाठ फुगलेली आणि फुगत चाललेली जनसंख्या, वाढत चाललेली भीषण आर्थिक विषमता, भ्रष्टाचार, जात - प्रांत - धर्म भाषा यातून वाढत चाललेली दुफळी आणि समाजमनाचे विभाजन, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवहारांभोवती आवळत चाललेले पाश, शिक्षणाक्षेत्रात व्यापून उरलेले अभाव आणि त्यातून निर्माण होणारी निरक्षरता, प्रचंड बोकाललेला चंगळवाद, कुप्रशासन, ब्रेनड्रेन इत्यादी काही ठळक उदाहरण सांगता येतील.

या सर्वात काही बदल घडवायचा असेल तर तो आपणच करायचा आहे आणि तो शिक्षणाच्या माध्यमानेच होऊ शकतो. पण त्यासाठी आताचे शिक्षण आणि शिक्षणतंत्र दोन्ही कुचकामी ठरलेले आहेत. त्यामधे बदल होणे नितांत गरजेचे आहे.

शिक्षण म्हणजे काय आणि कशासाठी ?

शिक्षण ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि श्वास चालतो तोपर्यंत ती चालूच राहतो. पण आपण शिक्षण म्हणतो तेव्हा ते शाळा - कॉलेजातून मिळालेल्या, किंबहूना कुणीतरी जाणीवपूर्वक दिलेल्या शिक्षणाचा विचार करीत असतो.. ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावे म्हणून समाजाने आणि प्रशासनाने केलेली व्यवस्था म्हणजेच शिक्षण- व्यवस्था.

कशासाठी शिक्षण या प्रश्नाचा विचार दोन बाजूंनी करावा लागेल. प्रत्यक्ष जी व्यक्ति शिक्षण घेत असते. तिला यातून काय मिळणार आहे आणि ज्या समाजाने ही शिक्षण-व्यवस्था निर्माण केली, ज्या समाजामधे त्या व्यक्तिला पुढेही रहायचं आहे, त्या समाजाला काय मिळणार आहे.

व्यक्तिगत उद्दिष्ट - शिक्षण घेण्याने शिक्षण घेणाऱ्याला काय मिळाले पाहिजे ? सर्वप्रथम शिकणे म्हणजे काय? कसे शिकायचे, कुणीहीकडून पटकन ज्ञान कसे घ्यायचे हे कळायला हवे.. शिक्षण व्यवस्थेबाहेरच्या जगातील ज्ञान कसे हस्तगत करायचे ही दृष्टि आली पाहिजे. चौकस बुद्धि निर्माण झाली पाहिजे. शिकण्याची आस लागली पाहिजे, त्याची गोडी आवड, लागली पाहिजे. शिकण्याविषयी, निरनिराळ्या विषयांबाबत मनात औत्सुक्य, आसुसलेपणा आणि शिकून घेण्याची हातोटी निर्माण झाली पाहिजे. थोडक्यातं शिकण हा छंद झाला पाहिजे. शिक्षणातून शिकण्याचा छंद जडला पाहिजे

दुसरे उद्दिष्ट -- देह टिकवण्यासाठी पोटाला भाजी भाकरी मिळालीच पाहिजे. ती कमवण्याची पात्रता शिक्षणातून मिळायला हवी . ती नेमकी पात्रता येत नसल्याने आजचे शिक्षण कुचकामी वाटते. तशीच ही पात्रता वर्षानुवर्ष शिक्षणात घालवता लौकरात लौकर निर्माण झाली पाहिजे. इतर कशालाही वेळ लागला तरी पोटार्थी शिक्षण कमीत कमी वेळात मिळाला पाहिजे.

शिक्षणाने भाजी - भाकरी कमावण्याची पात्रता यायला पाहिजे. जगाचा रामरगाडा चालतो आणि विकास पावतो. तो कौशल्याच्या आधारवर. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात ते अंगभूत कौशल्याच्या बळावर .

शिक्षणातून कौशल्य , कार्यकुशलता निर्माण झाली पाहिजे.

शिक्षणाची सुरुवात म्हणजे सत्याची जाणीव. खर काय आणि खोट काय हे जाणूनच आणि खऱ्याच्या बाजूने निर्णय घेऊनच पुढचे पाऊल टाकता येते - पुढचा जीवनक्रम चालवता येतो. सत्याची आच, सत्यनिष्ठा , निर्माण होण हे फक्त चांगल्या य़ोग्य शिक्षणानेच घडू शकत. किंबहूना ते घडवू शकत नसेल तर शिक्षण नाहीच. सत्याचा वेध घेण्यासाठी बुद्धि, मेधा, धृति प्रज्ञा या चारी प्रवृत्तिंची जोपासना झाली पाहिजे.

शिक्षणातून सत्यनिष्ठा यायला पाहिजे.

माणसाच्या जीवनात उपभोग बा अनिवार्य आहे. संपूर्ण जीवन धारणा उपभोगावर तोलून राहिलेली आहे. श्वास घेणे, भाजी - भाकरी खआणे हाही उपभोगचे आहे. असे असूनही उपभोग्य वस्तूंची निर्मिती देखील मानवी श्रमातून होत असते हे ही तितकच खर. म्हणूनच

शिक्षणाने श्रमनिष्ठा शिकवली पाहिजे.

स्वतःच्या श्रमातून केलेल्या निर्मिती पुरताच उपभोगण्याचा हक्क आपला आहे. इतरांच्या श्रमातून झालेल्या निर्मिती उपभोगण्याचा हक्क आपली नाही., हे सत्य मनावर बिंबले पाहिजे. यासाठी संतोष संयम पण यायला हवे.

श्रमातून निर्माण झालेली निर्मिती टिकवून कशी धरता येईल, वाया जाणार नाही, याची खबरदारी जबाबदारी पेलता आली पाहिजे.

उपभोगासाठी आवश्यक ती कलासत्यी शिक्षणातून आली पाहिजे.

श्रमाइतकीच निर्मितीसाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे अन्वेषणा. श्रम आणि उपभोग हे कुठल्याही सजीव प्राण्याला आवश्यक असे त्याचे उपजत गुण आहेत. माणसाला मात्र अन्वेषणा, अविष्कार , शोध यासाठी लागणारी वेगळी बुद्धि मिळाली आहे. त्या अन्वेषक वृत्तिची, वैज्ञानिक वृत्तिची, पुढे काय ततः किम् हे विचारण्याची सव., आणि पात्रता हीच माणसाचे माणूसपण .

शिक्षणाने वैज्ञानिक, चौकस,प्रश्नवाचक, अन्वेषक प्रतिभेचा विकास झाला पाहिजे.

माणसाची सहज अंतः प्रेरणा म्हणजे करूणा. दुसऱ्याचे सुखदुःख वाटून घेण्याची वृत्ति. दुसऱयाच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ति. हे माणूसपण शिकणही आवश्यक.

शिक्षणामुळे परदुखाःत समरसतेची वृत्ति आली पाहिजे. माणूस समाजात रहातो, समाजाकडून लखमोलाच शिक्षण घेतो. त्या समाजाच ऋण मानल पाहिजे. समाजातील आईवडील, शिक्षण यांच्या उपकाराची जाणीव ठेवली, गेली पाहिजे.

शिक्षणामुळे कृतज्ञता आली पाहिजे. समाजगत उद्दिष्ट आली पाहिजे. समाजगत उद्दिष्ट - ज्या समाजात आपण रहातो, त्याचे उपकार नुसते स्मरुन भागत नाही. ते दसपटीने परत फेडता आले पाहिजेत.

समाज टिकवण्यासाठी, एकसंध रहाण्यासाठी, त्याच्या विकास होण्यासाठी, नवीन येण्याऱ्या पिढ्यांचे जीवन जास्तीत जास्त संपुष्ट होण्यासाठी आपले हातभार लागले पाहिजेत. सामाजिक शांति टिकवली गेली पाहिजे. समाजाला योग्य ती दिशा आणि वळण मिळाल पाहिजे - देता आल पाहिजे. म्हणूनच शिक्षणाच्या समाजगत उद्दिष्टांची यादी मी येणेप्रमाणे करते -

  • शिक्षणमुळे सामाजिक ऋणांची जाणीव निर्माण होऊन त्यांची दसपट परतफेड करता आली पाहिजे.

  • शिक्षणामुळे त्याग, राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी बलिदान या भावनांची जाणीव आणि जागृति झाली पाहिजे.

  • सामाजिक शांति, समवेदना आणि समसरता टिकवण्याची हातोटी आली पाहिजे.

  • समाजाला प्रसंगी दिशा देण्यासाठी कधी नेतृत्वाची आघाडी तर कधी पिछाडीही सांभाळता आली पाहिजे.

  • समाजाला टिकवून धरण्याची कला, त्यासाठी आवश्यक ते नियम कानून घालून देणे, त्यांचा सांभाळ करणे, प्रसंगी ते बदलता येणे, प्रशासन चालवणे यासारख्या योग्यता यायला पाहिजेत.

हे सगळ कस होणार ?

एका शिक्षणातून हे सगळ कस होणार हा प्रश्न कुणालाही पडेल. आजच्या शिक्षण व्यवस्थेत तर यातले किती उद्देश साध्य होतात हे पहाण्यासाठी मायक्रोस्कोपच हाती घ्यावा लागेल. पण येणाऱ्या नवनवीन पिढ्यांना अस शिक्षण मिळायच असेल तर अशी शिक्षण व्यवस्था नव्याने निर्माण करावी लागेल. सध्याची शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. ते करताना दोन गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. आताच्या शिक्षण व्यवस्थेतल्या काही गोष्टी समूळ उपटून टाकून तिथे काही तरी नवीन घडवून आणून बसवान लागेल. काही गोष्टी तशाच ठेऊन, किंवा थोड्या प्रयत्नाने सुधारून त्यांच्या चातुर्याने वापर करून घ्यावा लागेल. अशी नवीन व्यवस्था तयार करण्यासाठी आपल्या हाती काय साधन सामुग्री आहे आणि ती अपुरी असेल ( नव्हे असणारच ) तर पूरक साधन सामुग्री कुठून आणायची तसेच हाती असलेल्या साधन सामुग्रीचा वापर कसा करायचा याचाही विचार करावा लागेल. नवीन बदलांची योजना करताना हे बदल नेमके कशासाठी कसे असतील हेही तपासून बघावे लागेल. हे बदल पाच- सहा प्रकाराने असतील.

शिक्षणाचा कालक्रम कमी करावा .

सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याची किती वर्षे जातात- दहा, बारा, पंधरा, सतरा, वीस, बावीस, पंचवीस... अशी चढती भाजणी आहे. दुसरीकडे निरक्षरतेचे प्रमाण भरमसाठ वाढत चालले आहे. सन २००० चे अनुमानित आकडे सांगतात की साक्षरतेचे प्रमाण साठ टक्क्यांच्या आसपास आहे. शंभर कोटींच्या देशांत चाळीस कोटी मनुष्यबळ निरक्षर आहे. त्यातही स्त्रिया, ग्रामीण स्त्रिया, शहरातील गलिच्छ वस्तीतील स्त्रिया, मागासवर्गीय जाती, आदिवासी, भटक्या जमाती, तर काही मागास राहिलेली बिहार सारखी राज्य, किंवा अरूणाचल प्रदेश सारखी दुर्गम राज्य, फार काय प्रत्यक्ष पुण्यासारख्या विद्येच माहेरघर म्हणवणाऱ्या स्थानाजवळील मावळ , मुळशी , वेल्हे, आंबेगाव यातील दुर्गम गावांमधे निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे. दुमका या बिहार जिल्ह्यांत महिला साक्षरता फक्त दोन टक्के आहे. यावरून आपल्याला " सर्वांना प्राथमिक शिक्षण" हा महत्वाचा टप्पा गाठायला देखील किती प्रयास पडणार आहेत याची कल्पना येते. एका व्यक्तीला साक्षर करण्यासाठी लागणारे श्रम, वेळ, उत्साह, कल्पकता आणि साहित्य या सगळ्यांची गोळा बेरीज करून त्याची किंमत जर हजार रूपये ठरवली तर फक्त निरक्षरता दूर करण्यासाठी येणारा खर्च चाळीस हजार कोटी रूपये असेल. त्यातून प्रत्येक नव्याने जन्माला येणाऱ्या बालकाला पुढे मागे साक्षर करावेच लागणार ही गरज ओळखली तर पुढे लागणाऱ्या खर्चाचा अँदाज येईल. सध्या देशांत दरवर्षी नव्याने सुमारे दहा लाख बालक जन्माला येतात. म्हणजे दरवर्षी फक्त साक्षरतेपोटी करावा लागणारा खर्च शंभर कोटींचा असणार आहे. मात्र या दहा लक्ष बालकांचा पहिलीच्या वर्गातील एकूण वर्षभराचा खर्च शंभर कोटींपेक्षा कितीतरी जास्त असेल हेही लक्षांत ठेवणे गरजेचे आहे.

Mehendale rues neglect of non- formal education

 

Mehendale rues neglect of non- formal education

The settlement commisioner and director, land recors (Maharashtra state), Ms.Leena Mehendale, today rued the fact that non- formal education was not being promoted in the Indian eduction system and wondered whether this was being done to protect “vested interests”.

" why does an individual have to undergo schooling? Why don't we recognise individual efforts?” she qieried, while suggesting that the government encourage individual to study outside classrooms and also absorb them in the formal stream after judging them by it's ( government's ) yardstiks.

Speaking on the subject, “Can we stop the mess in the education system?”, at the Vasant Vyakhanmala (spring lecture series) here, Ms mehendale advocated the introduction of short – term vocational courses in education system in a big way to enable the student earn his “bread and butter” rather than “Wasting” valuable years in pursuing formal education.

A majority of the students coming from the economically weaker sections of the society cannot afford to pursue the 15- year- long formal curiculam and hence high dropout rate in the country, she explained, while adding that in a country like India, students could not afford to spend 12 to 15 years in educating themselves.

Ms. Mehendale also emphasised the need to introduce courses on intermediary technology in the present curriculum as there was a dearth of what she called “middle-level technologists”. The country was producing docors engineers and researchers, but there were few technitians who could repair a worn – out washers which was obstructing the supply of water to the parchsd villages, she bemoaned.

She further warned that the social disharmony owing to the denial of education to the lower rungs of the society would ultimately end up harming the entire society, She opined that the middle-class , which had greater accessibility to education , should give due priority to “social gains” rather than “ personal gains”.

Education should imbibe “ moral” values and should not be treated as a mere exercise where one reads books and appears for exams. The lack of moral values was causing a majority of the younger generation go for easy money. Indian universities needed to take the student community into confidence while marking efforts to keep pace with the rapid technological developments, she observed.

She lamented that the bureaucracy had choosen to remain” silent observers” when it was in a position to dictate the policy regarding captation fees and primary school admissions. Finally, the judiciary had to intervene to put a ceiling on capitation fees and the state government had to pass bill to ban interviews for primary school admissions.

Tuesday, April 23, 2019

वाचन संस्कृती कशी वाढेल.-- आपटे वाचनालय इचलकरंजी स्मरणिकेसाठी


21/4/2019
आपटे वाचनालय इचलकरंजी स्मरणिकेसाठी
वाचन संस्कृती कशी वाढेल.
" मी पुस्तके चाऊन चाऊन वाचतो, ” खूप वर्षांपूर्वी एका नुकत्याच ओळख झालेल्या व्यक्तिने मला हे वाक्य सांगितले होते. आमची ओळखही त्यांच्या लेखनप्रतिभेमुळे, विशेषतः लेखनातील सुस्पष्ट विचारांमुळे झाली होती. ते कुणी मोठे लेखक वगैरे नव्हते – आताही नाहीत, पण विचारांची सुस्पष्टता आजही जाणवते. म्हणूनच की काय, एखादे नवे पुस्तक वाचायला घेतले की वरील वाक्य हमखास आठवते.
असाच दुसरा प्रसंग – एक सरपंच – लौकिकदृष्ट्या शालेय शिक्षणही पूर्ण न केलेले, पण विकासाची प्रगल्भ दृष्टि असलेले. त्यांच्या घरी चहाला गेलेली असताना हॉलमधील लांबच्या कोपऱ्यात बसून एक तरूण अत्यंत मंद आवाजातील रेडियो ऐकत होता. मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर सरपंच म्हणाले – चला आपण तिथे जाऊन रेडियो ऐकू. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नवाचक चिन्ह पाहून पुढे म्हणाले – रेडियो ऐकायचा असेल तर बारीक आवाज ठेऊन व पूर्ण लक्ष देऊन रेडियो ऐका अशी शिस्त मी घरात लावलेली आहे. रेडियोचा बदाबदा आवाज आपल्या कानांवर कोसळतोय आणि आपण दुसरेच कांही तरी करतोय असे होऊ देऊ नये. पूर्ण लक्ष देऊन ऐकले तर ते दीर्घकाळपर्यंत स्मरणात रहाते.
अगदी अलीकडचा तिसरा प्रसंग – झी टीव्हीवर सारेगमापा आणि सोऩीवर इंडियन आयडल एकाच वेळी सूरू होते. झी चॅनेलवरील स्पर्धक खूप छान गाण म्हणत होती – पण मनाने त्यातून हळूच डोक वर काढल, " तिकडे सोनी वर कोणते बरे गाणे चालू असेल? " - हात अभावित पणे रिमोट कण्ट्रोलकडे वळले, तेवढ्यात --- मनाच्याच कुठल्या तरी कप्प्यातून दुसरा आवाज आला – " समोरचे गाणे छान रंगत आहे – त्याचा पूरेपूर आंनद घ्यायला कधी शिकणार? का बरे याचवेळी दुसरीकडील माहिती तपासण्याचा मोह? तिकडले गाणे याहून चांगले असेलही किंवा नसेलही. पण तपासण्या करत बसण्यापेक्षा समोर जे चांगले आले आहे त्याचाच आनंद घ्यावा."
हे तीन प्रसंग मी कां मांडले आहेत? कारण तीनही मधे विचारपूर्वक ग्रहण करणे हा मुद्दा ठळकपणे दिसून येतो. नेमका हाच संस्कार आपल्या नव्या नव्या पिढ्या विसरत चालल्या आहेत. एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे भटकत जाणे याची एवढी सवय जडत आहे की एकाग्रता, किंवा एकतानता हा गुण आत्मसात करणे जमेनासे झालेले आहे.
ज्ञानग्रहणाचे पूर्वापार चालत आलेले मार्ग होते - एकाग्रश्रवण आणि एकग्रवाचन. या दोन्ही शब्दातील एकाग्र हे विशेषण महत्वाचे आहे. यांच्या जोडीला स्वाध्याय – म्हणजे स्वतःचे चिंतन करून एखादा विषय समजून घेणे हे ही महत्वाचे आहे. म्हणूनच " मी चावून चावून पुस्तक वाचतो " या वाक्याचे महत्व आहे. थोडेसे वाचन केल्यावर पूस्तक मिटून आतापर्यंत आपण काय वाचले, त्यातील काय समजले, त्यांतील किती आपल्या व्यवहारात उतरवायचे, अशा मुद्यांवर चिंतन करून मगच पुढची पाने वाचावी ही ती पध्दत.
आधुनिक काळात म्हणजे गेल्या साठ – सत्तर वर्षांत ज्ञान मिळवण्यासाठी रेडियो आणि टीव्ही ही दोन नवी माध्यमे निर्मांण झाली. पुस्तकवाचनापेक्षा कमी बौध्दिक श्रमात ज्ञानार्जन साध्य होऊ लागले. आळस हा मनुष्यस्वभावच आहे – मग तो शारीरिक आळस असो अथवा बौध्दिक आळस असो. याच न्यायाने लोक पुस्तककडून रेडियो, टीव्हीकडे व आता त्याही पलीकडे जाऊन सोशल मीडीयाकडे वळत चाललेले आहेत. झटपट लाभ, झटपट ज्ञान, सार कांही झटपट, ही त्या मागची मनोवृति आहे. म्हणूनच या मनोवृतिचे विश्लेषण व त्यातील धोके जोपर्यंत तरूण पिढीच्या लक्षात आणून दिले जात नाही तोपर्यंत त्यांना वाचन संस्कृतिकडे वळवणे कठीण आहे.
काही वर्षीपूर्वी एका परिचिताने मला त्यांच्या दोन-तीन व्याधींबाबत सांगितले. मी सुचवले की ही ही योगासने दोन दोन मिनिटे करा, लाभ होईल. ते स्वतः डाँक्टर होते. म्हणाले, छे, तेवढा वेळ कां घालवायचा? त्यापेक्षा औषधाच्या दोन गोळ्या घेतल्या की भागते. या संवादानंतर सुमारे दहा वर्षांनी त्यांनी मला सांगितले -- गोळ्या खाऊन उपयोग होत नव्हता, आता योगासने करतो- व्याधीमुक्त आहे, पण अहो, रोज वीस मिनिटे फुकट जातात.
म्हणजे रोगमुक्तिचा लाभ राहिला बाजूला, हा रोज योगासनांमधे जाणारा वेळ फुकट जातो आहे असेच त्यांना अजूनही वाटत होते. यातून आपण कांय मिळवतो आहे आणि त्याचे आपल्या जीवनात कांय मूल्य आहे याचा विचार ते अजूनही करत नव्हते.
वाचन संस्कृती देखील सध्या याच टप्प्यातून जात आहे. म्हणून वाचन संस्कारांची पेरणी देखील टप्याटप्याने करावी लागणार आहे. अगदी लहान बालकांना घरी पालकांनी पुस्तके वाचून दाखवणे, त्यांच्या हातात विविध विषयांची पुस्तके, बालमासिके, वर्तमानपत्र इत्यादि देणे, वाचलेल्या विषयांची चर्चा – असे कित्येक प्रकारचे संस्कार घरात घडू शकतात. पण त्यासाठी आईवडील अगर आजी-आजोबांनी वेळ काढणे अपरिहार्य आहे.
शाळेत नियमितपणे वाचनालय वर्ग असणे, वाचलेल्या गोष्टींचे सार ग्रहण रसग्रहण अथवा पाठ म्हणणे यासारखे उपक्रम शाळांमधे असले पाहिजेत. वीसेक वर्षांपूर्वी श्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी " गुजरात वाचतो आहे" या नावाने एक वाचन- मोहिम चालवली होती. तसे अजूनही बराच काळ करावे लागेल.
वाचनालये हे कुठल्याही शहराचे वैभव असते. महाराष्ट्रात एकेकाळी वाचनालयांनी खूप मोठ्या मोठया जनक्रांति घडविल्या आहेत. शंभर वर्षाहूनही अधिक काळ टिकलेली वाचनालये आपण आजही पहातो. मात्र या सांस्कृतिक समृद्धीची दखल शासन किंवा समाज प्रकर्षाने घेत नाही. यातील बव्हंशी वाचनालयांना सध्या एकरकमी मदतीची गरज आहे. इमारत दुरूस्ती, इलेक्ट्रिक वायरिंगचे नवीकरण, रॅक्स, कम्प्युटरायझेशन, अशा प्रकारची मदत तर हवीच आहे. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इथल्या जुन्या स्टाफकडे पुस्तकांच्याबाबत असलेली प्रचंड माहिती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना लेखन-प्रवृत्त केले तर येत्या कित्येक पीचडी विद्यार्थ्यांना संदर्भासाठी हे लेखन उपयुक्त ठरेल. पण या सर्व गोष्टी करण्याची सरकारची मनोभूमिका पाहिजे. त्याउलट आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी अगदी सध्याच्या बीजेपी शासनानेदेखील सरकारी वाचनालये देखील मोडीत काढण्याची तिथे स्टाफ न नेमण्याची किंवा असलेल्या स्टाफच्या मागण्यांचा विचार न करण्याची भूमिका घेतलेली आहे. नाही म्हणायला शिक्षण संचालकांच्या कार्यकक्षेत वाचनालये हा विषय देऊन ठेवलेला आहे. पण लोकांना कुठे वाचायला वेळ असतो असा विचार स्वीकारून वाचनालयांकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्याऐवजी वाचनसंस्कृति वाढेल अशी भूमिका असणारा योग्य अधिकारी आल्यास हे चित्र पालटू शकेल.
मला आश्यर्य वाटते ते हे की चांगल्या वाचनालयांचा लाभ घेऊन व मानाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत आलेले वरिष्ठ अधिकारी वाचनालयांच्या आणि वाचनसंस्कृतिच्या अधोगतिकडे अलिप्तपणे कसे पाहू शकतात?
एक मात्र मान्य करावे लागेल. यूरोप अमेरिका सारख्या विकसित देशातही टीव्ही व इंटरनेट आल्यानंतर वाचन संस्कृतिला थोडा फटका बसला होता पण त्यांनी आधुनिकीकरणाच्या व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर तोडगा शोधला. सर्व पुस्तकांची यादी, अनुक्रमणिका व पुस्तक परिचय इत्यादी माहिती वाचनालयाच्या वेबसाइटवर असणे, नवी नांव नोंदणी अथवा पुस्तक मागणी ईमेलच्या माध्यमातून सुलभ करणे, आधी कुणी तरी वाचायला घेतलेले पुस्तक परत आल्याची माहिती ईमेलवर पुरवली जाणे, प्रसंगी वाचकांपर्यंत कुरियर डिलिव्हरीने पुस्तक पोचवणे यासारखे उपक्रम सर्व वाचनालयांनी राबवले. एकमेकांकडील पुस्तकांची माहितीही कित्येक वाचनालये देउ लागली. या सर्वामुळे वेळेचा अपव्यय होत नाही असे लक्षात येऊन वाचक वर्ग पुन्हा वाचनाकडे वळू लागला. आपल्याही वाचनालयांमधे असे आधुनिकीकरण व्हायला हवे.
मला वाटते यासाठी यासाठी सरकारने एकदाच एकरकमी ग्रांट द्यावी. कुठे खर्च करणार ते न विचारता, तसले बंधन न घालता, द्यावी. पंधरा ते पंचवीस वर्षे टिकलेल्या वाचनालयांना पंचवीस लाख, २५ ते ५० वर्षे झालेल्यांना पन्नास लाख व त्यावरील सर्वांना एक कोटी. महाराष्ट्रातील सर्व वाचनालयांना नवी झळाळी येण्यासाठी फक्त शंभर – सव्वाशे कोटी रूपये पुरेसे आहेत. हजारो कोटी रूपयांच्या योजना करणा-या शासनाला हे सहज शक्य आहे.
वाचनालयांनी देखील त्यांच्या सदस्यांसाठी व्याख्यानमाला, ग्रंथ-वाचन, कविता- पाठ यासारखे उपक्रम घेत राहिले पाहिजेत. याबाबत नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने चालवलेला उपक्रम " ग्रंथ तुमच्या दारी" हा एवढा यशस्वी ठरला आहे की परदेशांत देखील मराठी वाचक याचा लाभ घेत आहेत. तसेच खेडयातील शाळांमधे वाचन संस्कृती वाढावी म्हणून rural relations या संस्थेद्वारे चालणारा ज्ञान –Key हा उपक्रमही विशेष उल्लेखनीय आहे.
शेवटी पुस्तकांचे गांव म्हणून प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्ह्यांतील भिलार गांवाचा उल्लेख निश्चितच करावा लागेल. वाचन संस्कृतीचा सर्वत्र ऱ्हास होत असातांना भिलारसारखे पुस्तकांचे गांव असणे व ते पर्यटन विभागाच्या नकाशावर असणे हे खूपच आशादायक आहे. याच न्यायाने दीर्घकाळ टिकलेली वाचनालयेदेखील पर्यटन विभागाने नकाशावर घेतली पाहिजेत.
--------------------------------------------------------------------------

Saturday, December 2, 2017

भारत का वस्त्र उद्योग

भारत का समस्त वस्त्र उद्योग हमारी बुनकर और अन्य ज्ञातियों पर निर्भर था तथा भारत के गाँव गाँव में वस्त्रों के मामले में देश आत्मनिर्भर था |
भूमिका :
प्राचीनकाल में भारत का वस्त्र उद्योग अन्य सभी देशों से बेहतर एवं उन्नत माना जाता था माना जाता है की भारत को सोने की  चिड़िया बनाने के पीछे वस्त्र उद्योग का बहुत बड़ा हाथ था एक समय था जब सारी दुनिया को लूटने वाले रोमन साम्राज्य के लोग भी तराजू में एक तरफ सोना रखते थे और दूसरी तरफ भारतीय कपडा और बराबर तौलकर सोना हमें दे दिया जाता था यहाँ तक की मुग़लों और अंग्रेजों के समय तक ढाका का मलमल और मालवा और बनारस से सबसे बेहतर वस्त्र बुनकर विदेशों में निर्यात किये जाते थे भारत में वस्त्र बनाने का कार्य कितना पुराना है,इसका अंदाज़ा इसी बात से लगाया जा सकता है की ऋग वेद के दूसरे मंडल में वर्णित ऋषि गृत्स्मद को प्रथम वस्त्र बनाने का श्रेय जाता है वैदिक आख्यानों में वर्णन आता है कि सर्वप्रथम ऋषि गृत्स्मद ने कपास का पेड़ बोया और अपने इस प्रयोग से दस सेर कपास प्राप्त की तथा इस कपास से सूत इन्होने बनाया। इस सूत से वस्त्र कैसे बनानायह समस्या थी। इसके समाधान के लिए उन्होंने लकड़ी की तकली बनायी। वैदिक भाषा में कच्चे धागे को तंतु कहते हैं। तंतु बनाते समय अधिक बचा हिस्सा ओतु कहा जाता है। इस प्रकार सूत से वस्त्र बनाने की प्रक्रिया ऋषि गृत्स्मद ने दी। इसके बाद सूती से आगे बढ़कर रेशमकोशा आदि के द्वारा वस्त्र बनने लगे। बने हुए वस्त्रोंसाड़ियों आदि पर सोने,चांदी आदि की कढ़ाईरंगाई का काम भी होने लगा। वस्त्रों को भिन्न-भिन्न प्राकृतिक रंगों में रंग कर तैयार किया जाने लगा और इस तरह भारतीय वस्त्रों का सारे विश्व में निर्यात होना शुरू हो गया । यहां के सूती वस्त्र तथा विशेष रूप से बंगाल की मलमल ढाका की मलमल के नाम से जगत्‌ में प्रसिद्ध हुई। इनकी मांग प्राचीन ग्रीकइजिप्ट और अरब व्यापारियों द्वारा भारी मात्रा में होती थी और ये व्यापारी इसका अपने देश के विभिन्न प्रांतों व नगरों में विक्रय करते थे।
भारतीय वस्त्र-उद्योग का विदेशियों द्वारा वर्णन :
कुछ विदेशियों ने भारत के वस्त्रों के बारे में वर्णन करते हुए जो लिखा हैवह नीचे वर्णित है –
सत्रहवीं सदी के मध्य में भारत भ्रमण पर आने वाले फ्रांसीसी व्यापारी टेवर्नीय सूती वस्त्रों का वर्णन करते हुए लिखता है ‘वे इतने सुन्दर और हल्के हैं कि हाथ पर रखें तो पता भी नहीं लगता। सूत की महीन कढ़ाई मुश्किल से नजर आती है।‘ वह आगे कहता है कि कालीकट की ही भांति सिकन्ज (मालवा प्रांत) में भी इतना महीन ‘कालीकट‘ (सूती कपड़े का नाम) बनता है कि पहनने वाले का शरीर ऐसा साफ दिखता था मानों वह नग्न ही हो।
बिना मशीनों और बड़े उद्योगों के किस तरह सतत विकास किया जा सकता है ,भारत के गाँव और लघु उद्योग इसका अद्भुत उदाहरण हुआ करते थे |
इसी तरह टेवर्नीय अपना एक और संस्मरण लिखता है की – ‘एक पर्शियन राजदूत भारत से वापस गया तो उसने अपने सुल्तान को एक नारियल भेंट में दिया। दरबारियों को आश्चर्य हुआ कि सुल्तान को नारियल भेंट में दे रहा हैपर उनके आश्चर्य का ठिकाना न रहा जब उस नारियल को खोला तो उसमें से ३० गज लम्बा मलमल का थान निकला।‘
ऐसे ही सर जोसेफ बेक को मि. विल्कीन्स ने ढाका की मलमल का एक टुकड़ा दिया। बेक कहते हैं कि यह विगत कुछ समय का वस्त्र की बारीकी का श्रेष्ठतम नमूना है। बेक ने स्वयं जो विश्लेषणमाप उस वस्त्र का निकालकर इंडिया हाउस को लिखकर भेजावह निम्न प्रकार है- “मि. बेक कहते हैं कि विल्कीन्स द्वारा दिए गए टुकड़े का वजन-३४.३ ग्रेन था (एक पाउण्ड में ७००० ग्रेन होते हैं तथा १ ग्राम में १५.५ ग्रेन होते हैं।)लम्बाई-५ गज ७ इंच थीइसमें धागे-१९८ थे। यानी धागे की कुल लम्बाई-१०२८.५ गज थी। अर्थात्‌ १ ग्रेन में २९.९८ गज धागा बना था। इसका मतलब है कि यह धागा २४२५ काऊंट का था। आज की आधुनिक तकनीक में भी धागा ५००-६०० काऊंट से ज्यादा नहीं होता।“
१८३५ में एडवर्ड बेञ्ज ने लिखा ‘अपने वस्त्र उद्योग में भारतीयों ने प्रत्येक युग के अतुलित और अनुपमेय मानदंड को बनाए रखा। उनके कुछ मलमल के वस्त्र तो मानो मानवों के नहीं अपितु परियों और तितलियों द्वारा तैयार किए लगते हैं।
इस तरह के कई उदाहरण है जो भारत के बुनकरों एवं कारीगरों की कार्य कुशलता एवं कारीगरी के गुणगान करते नज़र आते हैं भारत का समस्त वस्त्र उद्योग हमारी बुनकर और अन्य ज्ञातियों पर निर्भर था तथा भारत के गाँव गाँव में वस्त्रों के मामले में देश आत्मनिर्भर था बिना मशीनों और बड़े उद्योगों के किस तरह सतत विकास किया जा सकता है भारत के गाँव और लघु उद्योग इसका अद्भुत उदाहरण हुआ करते थे |
अंग्रेजों का कुचक्र:
अंग्रेजों के समय में जब भारत का कपडा ब्रिटेन पहुंचा तो वहाँ की जनता इसके पीछे पागल हो गयी तथा सारा बाज़ारभारत के कपड़ों से भर गया नौबत यहाँ तक आ गयी की वहाँ के लोगों ने उनके यहाँ का कपडा पहनना बंद कर दिया इससे तंग आकर वहाँ के व्यापारियों ने विरोध प्रदर्शन शुरू कर दिया जिसके फलस्वरूप १७०० में भारतचीन और पर्शिया से आने वाले कपड़ो पर रोक लगा दी गयी इसके बाद भी जब लोग नहीं माने तो भारत से आये कपड़ों को ब्रिटेन में इकठ्ठा करके बाकी यूरोप में बेचा जाने लगा तथा भारतीय कपडे की नक़ल करके ब्रिटेन के कुछ बुनकर उससे कम स्तर का कपडा बनाना सीख गए और ब्रिटेन में वो बेचने लगे |
आने वाले तीन दशकों में अंग्रेजों ने चरखे को मशीन का रूप देने का प्रयास शुरू कर दिया एवं अंत में जेनी के नाम से एक मशीन और मिल स्थापित करली गयी |
इसके बाद भी अंग्रेजी व्यापारियों का मन नहीं माना तो १७२१ में ब्रिटिश संसद ने बिल पास करके आम आदमी तथा व्यापारियों पर जुर्माना लगाना शुरू कर दिया जिसके पास भी भारतीय सूत मिल जाता उसपर भारी जुर्माना लगाया जाता था आने वाले तीन दशकों में १७३३ से १७६५ के बीच अंग्रेजों ने चरखे को मशीन का रूप देने का प्रयास शुरू कर दिया एवं अंत में जेनी के नाम से एक मशीन और मिल स्थापित करली गयी [i]हलाकि इसकी भी गुणवत्ता भारतीय वस्त्र से कम ही थी मगर इसमें एक साथ बहुत सा वस्त्र बनाने की क्षमता थी इसका प्रयोग अंग्रेजों ने तेजी से शुरू कर दिया एवं भारतीय वस्त्र उद्योग पर भारत में कई तरह के कर लगा दिए एवं ब्रिटेन में इन वस्त्रों को बेचने पर रोक लगवा दी गयी धीरे धीरे भारत का व्यापार दुनिया से कम होने लगा और अंग्रेजों का व्यापार तेजी से फैलने लगा |
भारतीय व्यापार पर कर लगाना भारतीय माल को यूरोप में ना बिकने देना आदि कानूनों के अलावा बंगाल के कई बुनकर और कलाकारों से भी मार पीट कर उनका धंधा जबरन बंद करवाने का काम ब्रिटिश ने किया इसके साथ ही इन्होने इतना अधिक कर भारत के लघु उद्योगों और बुनकर समाज के ऊपर लगाया की भारत का व्यापार उद्योग और निर्यात का सारा ढांचा चरमरा गया इसके बाद अंग्रेजों ने विदेशों के साथ साथ भारतीय बाज़ार को भी अपने कपड़ो से भर दिया |
अमेरिकन क्रांति के समय भारत का वस्त्र उद्योग फिर से थोडा ऊपर उठा पर अंग्रेजों की पक्षपाती नीतियों और आधुनिक मशीनों के कारण उतनी उन्नति नहीं कर पाया जितनी प्राचीन समय में की थी|
आधुनिक भारत :
जितने हाथ उतना काम’ सिद्धांत की अनदेखी करके भारत ने ‘जितना काम उतने हाथ’ का सिद्धांत अपना लिया था |
आज़ादी के बाद भारत में चूँकि अंग्रेजों के कर के नियम नहीं हटाये गए अतः छोटे उद्योग और बुनकर धीरे धीरे समाप्त होते चले गए भारत के वस्त्र  व्यापार का एक बड़ा हिस्सा पूर्वी – पकिस्तान ( वर्तमान बांग्लादेश ) में चला गया यही नहीं अंग्रेजों और रूस की औद्योगीकरण की नीति अपनाने के कारण कारखानों से कपडा बनना शुरू हो गया इससे नेहरु मॉडल तो सफल हुआ मगर गांधीजी का सपना अधुरा रह गया क्योंकि ‘जितने हाथ उतना काम’ सिद्धांत की अनदेखी करके भारत ने ‘जितना काम उतने हाथ’ का सिद्धांत अपना लिया था अंग्रेजों तथा यूरोप के देशों में चूँकि लोग कम रहते थे और उत्पादन ज्यादा करना होता था अतः वहाँ मशीनी मॉडल कारगर सिद्ध हुआ मगर भारत का प्राचीन मॉडल विकेंद्रीकरण का मॉडल था जिसमे करोडो लोगों को हर गाँव में रोजगार दिया जाता था मगर भारत में भी कारखाने और मशीनीकरण के मॉडल को अपनाने के कारण हुनरमंद कारीगरकलाकार और बुनकर बेरोजगार होते चले गए तथा कईयों ने आत्महत्या कर ली या पेशा छोड़कर मजदूरी करने लगे |
आज समय है भारत के लघु उद्योगों और कलाकारों को समझने का तथा अंग्रेजों के लगाये करों को हटाने का यदि भारत की सरकार हमारी जातियों के प्राचीन हुनर को समझकर उन्हें बढ़ावा देने का काम करती है तो ना सिर्फ भारत के करोड़ों लोगों को रोजगार मिलेगा बल्कि बिना ज्यादा औध्योगिक लागत के भारत फिर से खड़ा हो जाएगा असल में स्किल डेवलपमेंट इसी दिशा में होना चाहिए अन्यथा सभी को अंग्रेजी और कंप्यूटर सिखाकर हम सिर्फ बड़े शहरों में शौपिंग मॉल का चौकीदार या दूकान पर खड़ा रहने वाला अटेंडेंट बना कर छोड़ देंगे हमें आज अंग्रेजों से जीतना है तो खेल उनका नहीं हमारा चुना हुआ होना चाहिए |

Monday, April 20, 2015

बाबासाहेब यांचे विचारधन

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

🚩ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.

👉ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्‌ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.

📌आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही "एक राष्ट्र' म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण "अखंड हिंदस्थान'च आपल्या हिताचा वाटू लागेल.

📎माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.

💪जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.

✒देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.

📍आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.

🔴कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

?🍅🌽शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.

💂हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.

💰🏭पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.
माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो.

🌞प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत "बहिष्कृत भारता'चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.

🇮🇳मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.
अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.

🚩धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- "काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल.

🐍ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.
तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको.

🌷राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

📎सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.

📍मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.

🔫💣हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.

🚩मला बोैद्धधर्मही आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्‌भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.

#डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त

Sunday, April 12, 2015

शिक्षण- व्यवस्था सुधाराची दिशा

                                शिक्षण- व्यवस्था

                नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच देशातील समाज- व्यवस्था बिघडली आहे हे  सांगायला कुणा तज्ञ्ज्ञाची गरज उरलेली नाही. या बिघाडांचे  पाढेही आतापर्यंत खुपदा वाचले गेले आहेत. भरमसाठ फुगलेली  आणि फुगत  चाललेली जनसंख्या, वाढत चाललेली  भीषण  आर्थिक  विषमता, भ्रष्टाचार, जात- प्रांत-धर्म-भाषा यातून  वाढत चाललेली दुफळी आणि  समाजमनाचे  विभाजन, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे  देशातील आर्थिक  आणि  राजकीय व्यवहारांभेवती आवळत  चाललेले पाश,  शिक्षणक्षेत्रात व्यापून  उरलेले. अभाव आणि  त्यातून  निर्माण होणारी  निरक्षरता  प्रचंड बोकाळलेला चंगळवाद, कुप्रशासन, ब्रेनड्रेन  इत्यादी कांही ठळक  उदाहरणं सांगत येतील.
                     यासर्वांत कांही बदल घडवायचा असेल तर तो आपणच करायचा आहे आणि  तो शिक्षणाच्या  माध्यमानेच  होऊ  शकतो. पण त्यासाठी आताचे शिक्षण  आणि  शिक्षण -तंत्र दोंन्ही कुचकामी ठरलेले आहेत. त्यामधे  बदल होणे नितांत गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे कांय आणि कशासाठी?
                      शिक्षण ही एक  अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आणि  श्वास चालतो  तोपर्यंत ती चालूच रहाते.  पण आपण शिक्षण  म्हणतो तेंव्हा ते शाळा-कॉलोजातून  मिळालेल्या,  किंबहुना कुणीतरी  जाणीव-पूर्वक दिलेल्या  शिक्षणाबद्दल  बोलतो. असे जाणीवपूर्वक शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावे म्हणून समाजाने आणि शासनाने केलेली व्यवस्था   म्हणजेच शिक्षण  व्यवस्था.
                 कशासाठी शिक्षण या प्रश्नाचा विचार  दोन बाजूंनी करावा लागेल. प्रत्यक्ष  जी व्यक्ति शिक्षण  घेत असते.  तिला यातून कांय मिळणार आहे आणि ज्या  समाजाने ही शिक्षण-व्यवस्था  निर्माण  केली, ज्या समाज्यामधे त्या व्यक्तीला पुढेही  रहायचं आहे , त्या समाजाला कांय मिळणार आहे.
                व्यक्तिगत उद्दीष्ट- शिक्षण घेण्याने  शिक्षण घेणा-याला कांय मिळाले पाहिजे? सर्वप्रथम शिकणे  म्हणजे कांय? कसे  शिकायचे, कुणाहीकडून पटंकन ज्ञान कसे  हस्तगत करायचे ही दृष्टि आली पाहिजे.  चौकस बुद्धि निर्माण झाली पाहिजे.  शिकण्याची  आस लागली पाहिजे. त्याची गोडी व आवड,  लागली पाहिजे. शिकण्याविषयी, निरनिराळ्या विषयांबाबत मनात  औत्सुक्य, आसुसलेपणा, आणि शिकून  घेण्याची   सचोटी निर्माण झाली पाहिजे.  थोडक्यांत  शिक्षण हा छंद झाला पाहिजे.
                   *शिक्षणाने शिकण्याचा छंद जडला पाहिजे.
     देह टिकवण्यासाठी पोटाला भाजी भाकरी मिळालीच पाहिजे. ती  कमावण्यासाठी  पात्रता शिक्षणातून मिळायला हवी. ती  नेमकी येत  नसल्याने  आजचे शिक्षण  कुचकामी  वाटते.  तशीच ही पात्रता वर्षानुवर्ष शिक्षणात न  घालवता लौकरांत लौकर निर्माण  झाली पाहिजे. इतर कशालाही वेळ  लागला तरी  पोटार्थी शिक्षण  कमीत कमी वेळात मिळाला पाहिजे.
(अपूर्ण)