मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 29, 2014

अनिल गोरे यांचे प्रयत्न

एका प्राचार्यांचे आभार! 
२००८ वर्षी मी इ. ११ वी विज्ञान शाखेचा प्रवेश अर्ज मराठीतून असलाच पाहिजे म्हणून जोरदार मागणी केली. त्या मागणीबाबत थोडी खडाजंगी होऊन अखेर ती मागणी २०१० मध्ये मान्य करताना प्रवेश समितीचे अध्यक्ष असलेले प्राचार्य मला म्हणाले, " नुसता अर्ज मराठीत करा म्हणून भांडलात, नियम दाखवलात, पण विज्ञान शिक्षण कोठे मराठीतून मिळते?" या वाक्याने मी निराश झालो नाही, तर ११ वी विज्ञान शाखेचे वर्ग मराठीतून कसे सुरु होतील, याचे प्रयत्न दुसऱ्या दिवसापासून सुरु केले. अनेक इंग्रजीधार्जिण्या पुणेकरांना ही कल्पनाच अगोदर वेडेपणाची वाटली आणि माझी या पुण्यात भरपूर टिंगलटवाळी झाली पण यावर्षी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली.
वरील वाक्य उच्चारणाऱ्या त्या प्राचार्यांचे आभार ! त्यांची प्रेरणा उपयुक्त ठरून आता माझ्या मागणीवरून आणि पाठपुराव्याने अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदविका शिक्षण देखील मराठीतून मिळण्याची सोय झाली. मराठीकाका, अनिल गोरे


  • Bharat Karmarkar या सुविधेला समाजाने प्रतिसाद द्यायला हवा. समाजाची एक अडचण अशी असते की समूहशिक्षणाच्या आपल्या व्यवस्था दर्जेदार नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत किंवा लहान गटात शिकवण्या घेणारे लोक पालकांना हवे असतात. मराठी माध्यमातून ११वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेणा-या फक्त तीन मुले किंवा फक्त तीन मुली यांच्यासाठी मी हे काम करू शकेन.
  • लीना मेहेंदळे आज पुणे शहराच्या बाहेर गांवात गेलात तर बहुतेक प्राध्यापकांना मराठीतून विज्ञान शिक्षण शिकवणें जमणार आहे फक्त 2 अडचणी -- पारिभाषिक शब्द तोंडात बसायला थोडा वेळ लागेल. दुसरी अडचण मोठी आहे. जे सिद्धांत म्हणून इंग्रजीतून कमीतकमी शब्दात नेटकेपणे मांडलेले असतात (उदा आर्किमिडिस प्रिन्सिपल) ते समजले नसतील तर त्यांना तशाच नेमकेपणाने मराठीत मांडता येत नाही. इतरांना समजूनही देता येत नाही. ते प्राध्यापक इंग्रजीतूनच शिकवायला बघतात कारण पाठ करा रे म्हटलं की झालं. यासाठी अशा प्राध्यापकांसाठी शिकवण कार्यशाळा घेण्याची गरज राहील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एक मोठी आवश्यकता पूर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रम (DME, DEE, DCE वगैरे ) यासह सुमारे २०० हून अधिक पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम ज्यांना मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून शिकायचे असतील, त्यांना ते मराठीतून शिकवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा. ना. राजेश टोपे यांनी जाहीर केला. यासाठी लागणारी मराठी पुस्तके आणि मराठीतून शिकणारा शिक्षक वर्ग अल्पकाळात प्रशिक्षित करून राज्यातील विद्यार्थ्यांना प्रगत मराठी भाषेतून तांत्रिक शिक्षण मिळण्यासाठी हजारो शिक्षितांचा सहभाग आवश्यक आहे. यात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. यात मोठे नाव आणि भरपूर पैसाही मिळणार यात काही शंका नाही. - अनिल गोरे., मराठीकाका.
फार उशीर नाही. अजून तरी ८० % विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत जातात आणि
असे निर्णय झाल्यावर आता मराठी मध्यम नाकारण्याची वेळ येणार नाही.
मराठी मध्यामच्या शाळेत मुलांना घालायला निघालेल्या पालकांना " १० वी पुढचे

शिक्षण मराठीत नाही, पुढे काय करशील ?" हा प्रश्न गेली दीडशे वर्ष निरुत्तर
करीत होता. आता असे पालक निरुत्तर होणार नाहीत आणि मोकळेपणाने मराठी माध्यमाची
निवड करू शकतील. - अनिल गोरे, मराठीकाका.

------------------------------------------------------------------------------------------------------

निवेदन
मराठी माध्यमातून इ. ११ वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्याचा पर्याय शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ११ वी प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध करून दिला. ११ वी विज्ञान शाखेतील मराठी माध्यमासाठी ८० जागा उपलब्ध असताना हा पर्याय निवडण्यासाठी ८३३ आवेदनपत्रे भरली गेली आहेत. ११ वी विज्ञान शाखेत मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मेळावे समर्थ मराठी संस्था आणि मराठी आयोजित केला जाणार असून अशा विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनामूल्य मेळाव्याला येण्यासाठी नावनोंदणी करावी, हे आवाहन ! नावनोंदणीसाठी ११ वी मराठी माध्यम असे लिहून पुढे आपला दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्र. तसेच नाव पुढील क्रमांकावर संदेश (SMS) पाठवावा. मेळाव्याची वेळ आणि ठिकाण कळविले जाईल.
संपर्क - मराठीकाका, प्रा. अनिल गोरे. अध्यक्ष - समर्थ मराठी संस्था ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११०३० भ्र. ९४२२००१६७१. आणि प्रा. विनय र.र. कार्याध्यक्ष मराठी विज्ञान परिषद टिळकस्मारक मंदिर आवार, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. ९४२२०४८९६७
---------------------------------------------------------------------------------------
११ वी विज्ञान शाखेसाठी अधिकृतपणे मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध झाल्यावर उपलब्ध जागांपेक्षा दहापटीहून अधिक प्रतिसाद लाभला. येत्या दोन वर्षात मराठी माध्यमातून ११ वी १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखाहून अधिक होण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. प्रगत, समृद्ध, संपन्न मराठीतून विज्ञान शिकून नवे संशोधन, नवे संशोधक महाराष्ट्रात आढळतील, यासाठी सर्वांनी पाठींबा द्यावा. - मराठीकाका, अनिल गोरे.
सोबतची बातमी लोकसत्ता पण ४ दी. २६ /६/२०२४ या अंकातील आहे.


















-शाळेत मराठीतून विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली दीडशे वर्षे पुढील विज्ञान शाखेतील शिक्षण घेताना प्रवेशाच्या वेळी विज्ञान शाखेसाठी मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध नसे, म्हणून इच्छा नसतानाही लाखो लोकांनी या शाखेत इंग्रजी माध्यमाला नाईलाजाने प्रवेश घेतला. गेली सात वर्षे मी सरकारकडे पाठपुरावा केला त्याला यश मिळून यावर्षी (जून २०१४) पुणे विभागात मराठी माध्यम विज्ञान प्रवेशासाठी ८० जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी ८३३ अर्ज आले आहेत. या सर्व ८३३ जणांना विज्ञान मराठी माध्यमात प्रवेश मिळावा यासाठी मी आजपासून पाठपुरावा सुरु केला आहे, मराठीप्रेमींनी यासाठी सहकार्य करावे- . या ऐतिहासिक घटनेचे स्वागत आणि शासनाचे आभार !मराठीकाका, अनिल गोरे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी हे शिक्षणासाठी उत्तम माध्यम आहे. कोणत्याही शिकवणीचे शुल्क भरणे परवडत नसलेले मराठी माध्यमाचे विद्यार्थी इ. १० वी परीक्षेत आपापल्या गावात ९४ - ते ९७ % हून अधिक गुण घेऊन पहिल्या क्रमांकाने यशस्वी झाले.(या यशाची माहिती देणारी मालिका रोज झी मराठीवर दाखवली जाते. ) लाखो रुपयांचे शाळा शुल्क आणि हजारो रुपयांचे शिकवणी शुल्क भरणाऱ्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इतके झळझळीत यश मिळालेले नाही. इंग्रजी माध्यम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निराश होऊ नये, इंग्रजी माध्यम निवडून आपण केलेली भयंकर चूक सुधारणे शक्य आहे, हे समजून घ्यावे. चूक सुधारण्यासाठी आजच इ. २ री पासूनची सर्व विषयांची मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके घरी आणा आणि आपल्या इंग्रजी माध्यमातील मुलांच्या अभ्यासाची एक उजळणी प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी भाषेतून करून घ्या. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांबाबत होणारे आपले अपरिमित नुकसान टाळण्याचा हा एकमेव आणि प्रभावी मार्ग महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषकांनी ( विशेषत: मुलांना आग्रहाने इंग्रजीत माध्यमात घातलेल्या महिला पालकांनी ) अवश्य अनुसरावा, हे आवाहन ! - अनिल गोरे.

अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड विभागाने ११ वी विज्ञान शाखेतील मराठी माध्यमाचे वर्ग सुरु करण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या दोनशे वर्षात शाळेच्या शिक्षणानंतर ११ वी विज्ञान शाखेत मराठी मध्यम घेऊन शिकण्याची सोय नव्हती, ती आता श्रीमती सुमन शिंदे : शिक्षण उपसंचालक , पुणे यांनी उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना ११ वी विज्ञान (सायन्स) च्या वर्गात सर्व विषय मराठीतून शिकायचे असतील, त्यांनी अर्ज भरताना हा पर्याय निवडावा, हे आवाहन ! महाराष्ट्राचे प्रगतीकडे पडलेल्या या पहिल्या पावलाचे स्वागत करा. मराठीकाका, अनिल गोरे.

ग.रा.पालकर नावाची एक मराठी शाळा आहे, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे... शाळा उत्तम आहे. फार अडचणीतून ही शाळा वरती येत आहे. कालच १०वीचा निकाल लागला त्यात ह्या शाळेचा निकाल १००% लागला आहे. ही शाळा उत्तम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. ... ह्या मराठी शाळेच्या काही मुलांना तुमची मदत हवी आहे. वह्या, शैक्षणिक साहित्य अशी ती मदत आहे. . जरूर जरूर संपर्क साधा... मंजिरी जाधव ९७३००३३४१२. अगदी कदाचित वर्गात शिकवत असल्या तर त्या फोन घेऊ शकणार नाहीत, तसं झालं तर पुन्हा प्रयत्न करा आणि शाळेला भेटही द्या. इंग्रजी शाळांच्या फुकाच्या दिमाखात आपणच मराठी शाळांना ताकद दिली पाहिजे... जय महाराष्ट्र! अनिल गोरे.

भारतीय भाषेतून शिकल्याचा प्रचंड लाभ !
राम, शाम यादव नावाचे उत्तर भारतातील दोन बंधू महापालिकेच्या शाळेत हिंदी या भारतीय भाषेत शिकले. ११ वी, १२ वी ला त्यांनी हिंदी या भारतीय भाषेतून भौतिक, रसायन, गणित विषय शिकले. आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या वर्गांचे अफाट शुल्क देण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यांनी स्वत:ला समजणाऱ्या हिंदीतून अभ्यास केला आणि या प्रवेश परीक्षेच्या दोन्ही टप्प्यात ४०० व्या क्रमांकाच्या आत क्रमांक पटकावला. इंग्रजीवर १०० % अवलंबून राहिलेले हजारो पुणेकर विद्यार्थी मात्र तुलनेने फार कमी यश मिळवू शकले आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांना अधिक यश मिळण्यासाठी भारतीय भाषांमधून अभ्यास आणि प्रवेश परीक्षा हा दुहेरी उपाय उपयुक्त ठरेल. या पद्धतीची उपयुक्तता मी आयआयटी च्या संबंधित अधिकार्यांना पटवून दिल्यावर २०१४ पासून त्यांनी IIT JEE mains ani advance या दोन्ही परीक्षा मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. - मराठीकाका, अनिल गोरे.

मराठी पाउल आणखी पुढे!
मागासलेली इंग्रजी भाषा आणि दरिद्री रोमन लिपी यामुळे कोणत्याही अभ्यासक्रमातील इंग्रजी पुस्तकांचा अभ्यास करताना मराठीच्या तुलनेत दुप्पट ते पाचपट शब्द आणि तिप्पट ते आठपट अक्षरे वाचणे, लिहिणे, लक्षात ठेवणे भाग पडते. अभ्यासाला अधिक वेळ लागतो, अधिक कंटाळा येतो आणि त्यामुळे विषयाचे आकलन विद्यार्थ्याच्या क्षमतेपेक्षा कमी होते. काही विषयांचा अभ्यास इंग्रजी पुस्तकातून करणे भाग पडत होते कारण संबंधित मराठी पुस्तकेच नव्हती. मी ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील भौतिक, रसायन, जीवशास्त्राची मराठी पाठ्यपुस्तके निर्माण केली.
इंग्रजी पुस्तकातून क्षमतेपेक्षा कमी आकलन होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत इंग्रजीतून शिकतानाच ही मराठी पुस्तके वापरून अपेक्षेपेक्षा थोडे अधिक यश मिळवले. १२ वीतील अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
कालच ही मराठी पुस्तके परेश ठाकूर ७३८३१२५१२३ या सुरतमधील माणसाने पुण्याहून मागविली. गुजरातेतील शाळा, महाविद्यालयात जिथे मागासलेली इंग्रजी भाषा हे माध्यम असले तरी शिक्षक सर्व भाग गुजराती या प्रगत भारतीय भाषेतून समजावून देतात, म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांना विषय उत्तम कळतात. तिथल्या मराठी विद्यार्थ्यांना या दोन्ही भाषांपेक्षा मराठी अधिक उपयुक्त ठरत असल्याने आता गुजरातेतील मराठी भाषक विद्यार्थी यापुढे मराठी पुस्तकांचाही आधार घेऊ लागली आहेत.
विषय कळत नसला तरी इंग्रजीतून शिकत राहणे हा काही प्रगतीचा चांगला मार्ग नव्हे, तर अधिक चांगले कळण्यासाठी कोणत्याही विषयाशी संबंधित मराठी पुस्तके वाचून अधिक चांगले आकलन करून घेणे हा स्वत:चे भले करण्याचा उत्तम मार्ग आहे. -अनिल गोरे.

मी काल प्रसिद्ध केलेली पेरूगेट भावे शाळा, पुणे येथील स्थितीची माहिती मिळाल्यावर राज्यभरातील तीन प्राध्यापकांनी माझ्याशी संपर्क साधला. ते येत्या जूनपासून त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्येक तासाला जे काही इंग्रजीतून शिकवतील तेच पुन्हा मराठीतून समजावून देणार आहेत. पालकांच्या हव्यासापोटी अधिकृत माध्यम इंग्रजी ठेवून मग मुलांच्या हितासाठी, प्रगतीसाठी अनौपचारिक रीत्या मराठी माध्यम वापरणे ही माझी सूचना त्यांना भलतीच आवडली आहे. चला, त्यांचे अनुकरण करू ! ही पद्धत मी स्वत: गेली अनेक वर्षे वापरत असून त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले. 2013 मध्ये IIT - JEE ला पहिला आलेला विद्यार्थी यश भळगट हा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी माझ्याकडे अशाच प्रकारे शिकला होता. - प्रा. अनिल गोरे.

मराठी माध्यमाचे सामर्थ्य !

पुण्यातील पृथ्वी नावाचा एक शिकवणी वर्ग राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोग परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग चालवतो. या वर्गातील तीस जण यंदा राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झाले. हे सर्वजण १ ली पासून १० वी पर्यंत मराठी माध्यमात शिकले. कोवळ्या वयात मराठी या प्रगत, समृद्ध आणि संपन्न भाषेत शिकल्यामुळे त्यांना असे मोठे यश मिळाले.

शेजारच्या आया - बायांचे अर्धवट ज्ञानाने भरलेले शेरे ऐकून पिडलेल्या काही पालकांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी आपली मुले इंग्रजी माध्यमात घातली होती, तशी दुर्दैवी मुले देखील या शिकवणी वर्गात तेच प्रशिक्षण घेत होती. १ ली ते १० वी इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या त्यातील कोणालाही असे यश इंग्रजी भाषा या विषयात देखील मिळाले नाही. या दुर्दैवी मुलांनी दोन महिने धडपड करून मराठी भाषेवर पकड मिळवली तर त्यांना पुढची परीक्षा मराठीतून लिहिता येईल शिवाय त्यांची इंग्रजीही सुधारेल आणि त्यांना अधिक यश देखील मिळेल असे वाटते. - मराठीकाका, अनिल गोरे.

गेल्या काही दिवसातील शैक्षणिक माध्यमाबाबतची चर्चा पाहून काही सधन तरुण पालक आपल्या चिमुकल्या तीन वर्षीय मुलांना मराठी माध्यमात घालण्याची इच्छा व्यक्त करू लागले आहेत. मराठीतून ११ वी आणि १२ वी सायन्स चा अभ्यास आणि परीक्षा दोन्ही शक्य आहे हे कळल्यावर संजय गोडबोले या सधन पालकाने २०१० मध्येच आपल्या मुलाला मराठी शाळेत घातले. आपला मुलगा ११ वी ला जाईपर्यंत ११ वी, १२ वी तसेच इंजि/ मेडिकल सह सर्व अभ्यासक्रमात मराठी माध्यम रुजलेले असावे, म्हणून मी निर्माण करत असलेल्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकासाठी त्यांनी मला २५००० रुपयांचे बेमुदत, बिनव्याजी कर्ज दिले. ते पुस्तक निर्माण झाल्यावर आपले पैसे लगेच परत न घेता त्यांनी मला ते पैसे इतर मराठी पुस्तके निर्माणासाठी वापरायची सूचना केली. आता भौतिकशास्त्र, रसायन आणि जीवशास्त्राची ११ वी, १२ वीची पुस्तके तयार असून आम्ही १ फेब्रु. २०१४ पासून इंजि ची मराठी पुस्तके निर्मितीचा प्रकल्प सुरु करीत आहोत. आता यापुढे नुसता फेसबुक पाठींबा न देता या प्रकल्पात लेखक म्हणून सहभाग घ्यावा हे सर्व तज्ञांना आवाहन ! या सहभागात पैशापेक्षा मराठीतून इंजि च्या विषयांचे लेखनासाठी सहकार्य हवे आहे. - मराठीकाका, अनिल गोरे.

झटपट कळणे हा मराठी भाषेचा अंगभूत गुण असून शक्यतोवर लवकर काहीही न समजणे हा इंग्रजी शब्द समूहाचा अंगभूत विशेष गुण आहे. मराठीच्या या गुणाचा लाभ इंग्रजी माध्यमातील मुलांनाही मिळावा म्हणून मी 'वेगाभ्यास' पद्धती विकसित केल्या आहेत. अधिकाधिक लोकांनी आपल्या भाषिक अंधश्रद्धा बाजूला ठेवून आपल्या मुलांचे भले करून घ्यावे. आपली मुले इंग्रजी माध्यमात एखाद्या इयत्तेत असतील तर त्यांना १ ली पासून त्या इयत्तेपर्यंतची सर्व विषयांची मराठी माध्यमातील पुस्तके आणून द्यावी आणि त्याही पुस्तकांचा नीट अभ्यास करायला लावावा. समृद्ध मराठी भाषेचा स्पर्श मोठे यश मिळवून देऊ शकतो. - मराठीकाका, अनिल गोरे.

११ वी, १२ वी अभ्यासक्रमातील भौतिक(फिजिक्स) रसायन केमिस्ट्री) जीव (बायोलोजी) आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका १९७७ पासून दरवर्षी मराठीतून काढल्या जातात. मराठीतून उत्तरे लिहिण्याचा पर्याय जे विद्यार्थी परीक्षा अर्जात निवडतात, त्यांना मराठी प्रश्नपत्रिका मिळते, त्यातील प्रश्नांची मराठीत उत्तरे लिहिता येतात. वरील चार विषयांच्या ऑक्टो.2013 मधील प्रश्नपत्रिका ज्यांना पाहायला हव्या असतील त्यांनी कृपया marathikaka@gmail.com या पत्त्यावर आपली मागणी करावी. काही तांत्रिक अडचणीमुळे(अज्ञानामुळे ) मला मी बनवलेला नमुना फेसबुकवर प्रदर्शित करता येत नाही., पण मी कोणालाही त्यांच्या वी पत्त्यावर (इमेलवर) हा संच पाठवून देईन अधिक माहितीसाठी www.samarthmarathi.com वर लेख हा विभाग पहावा. हे तीपण वाचणार्या प्रत्येकाने या मराठी प्रश्नपत्रिका प्रत्येक १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती! -अनिल गोरे.

माझ्या सहा वर्षांच्या प्रयत्नाला यश आले. मुंबई शहरातील चि. प्रणित दबडे हा IIT-JEE साठी मराठी प्रश्नपत्रिकेची मागणी करणारा पहिला विद्यार्थी आहे. मराठी या प्रगत भाषेतून IIT-JEE देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रणितचे अभिनंदन! याच परीक्षेत गुजराती भाषेत प्रश्नपत्रिका मिळावी, म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सतत प्रयत्न करत होते. त्यांच्या पदामुळे त्यांची मागणी लवकर मान्य होऊन तीन वर्षांपासून गुजरात राज्यातील केंद्र निवडणार्या विद्यार्थ्यांना वरील परीक्षेत गुजराती शब्दांसह गुजराती प्रश्नपत्रिका मिळू लागली आहे. मी त्या मानाने लहान कार्यकर्ता असून मनात असलेली तळमळ सोडून इतर काही सामर्थ्य नसल्याने मराठी शब्दांसह मराठी प्रश्नपत्रिका मिळावी ही माझी मागणी तीन वर्षे उशिरा मान्य झाली.
आजपर्यंत ८५ विद्यार्थ्यांनी मराठीचा पर्याय निवडला. लवकरच ही संख्या वाढेल. या परीक्षेसाठी सध्या मराठी पुस्तके नाहीत टी पुढील वर्षी मी उपलब्ध करून देणार आहे. - मराठीकाका,अनिल गोरे




























Wednesday, March 12, 2014

पणजी, जल साक्षरता अभियान अध्यक्षता -रिपोर्ट

पर्यावरण सुरक्षिततेसाठी समाजाने एकजुटीने लढावे
पणजी : नद्या आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत. देशात प्रत्येक नदीला मातेच्या नावाने संबोधले जाते. पृथ्वीवर केवळ ४ टक्के पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. विविध खात्यांतील अनेक सरकारी योजना दुसर्‍या योजनेला फाटा देते. योजनांमधील लढय़ात सामाजिकरण, पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. योग्य विचार करून पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने लढा दिल्यास समाज पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सक्षम बनू शकेल, असे मत गोवा राज्य माहिती आयोगाच्या प्रमुख माहिती आयुक्त लीना मेहंदळे यांनी 'जलसाक्षरता अभियान' कार्यक्रमात मांडले.
'अनाम प्रेम' संस्थेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'जलसाक्षरता अभियान'च्या माध्यमातून नद्यांचा महिला जीवनावर होणारा परिणाम व भारतीय संस्कृतीने नद्यांना दिलेला मातृपदाचा मान याविषयी राष्ट्रीय स्तरावर जागृती करण्यासाठी मंगळवारी कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पर्यावरणीय पत्रकारितेत सक्रिय असलेले पुणे जलबिरादरीचे संयोजक सुनील जोशी व पर्यावरणतज्ज्ञ आय.आय.टी.चे केमिकल इंजिनिअर डॉ. उदय शंकर भवाळकर उपस्थित होते.
मेहंदळे म्हणाल्या की, पर्वत प्रदक्षिणा आणि नदी परिक्रमा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहेत. वाळू हा पाण्याचा संरक्षक स्तर असतो. आपण आधुनिकतेच्या ओघात भारतीय परंपरा विसरत चाललो आहोत. सरकारने वाळू उपसण्याची परवानगी देताना त्याचा पाण्याच्या पातळीवर परिणाम होणार असल्याचे विसरता कामा नये. पर्यावरण टिकवायचे असेल, तर समाजाने स्वत:पासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. भवाळकर म्हणाले, 'बायो सॅनिटायझर इको चिप्स'च्या माध्यमातून समुद्री पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करता येते. निसर्गाची भाषा मनुष्य प्राण्याने शिकल्यास नैसर्गिक आपत्ती रोखता येतील. जे आपल्याला नको ते मातीला परत करा, असा निसर्गाचा सिद्धांत आहे; पण आधुनिक, विज्ञानाच्या आंधळ्या श्रद्धेला बळी पडून निसर्गाच्या विरोधात कार्य करतात. पाणी स्वस्त मिळत असल्याने लापरवाईने वापरण्यात येते, ते महाग केल्यास वाचेल. समुद्राचे खारे पाणी शेतीसाठी वापरता येते. गोव्याला समुद्र संपदा लाभली आहे. यावर संशोधन करून समुद्राचे पाणी शेतीसाठी वापरण्यास यावे. गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तो कृषिप्रधानही आहे. गोव्यात आताच योग्यप्रकारे पाण्याचे नियोजन न केल्यास अर्थव्यवस्था कोलमडू शकते, अशी शक्यता डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली.
जोशी म्हणाले की, प्रदूषण, शोषण आणि अतिक्रमण यांनी नद्यांना संपविले आहे. गोव्यातील ग्रामीण भाग हा शेती-बागायतीवर अवलंबून आहे; पण गोव्यातील पाण्याची पातळी पाहता चिंताच जाणवते, असे नमूद केले. युवकांनी स्वयंप्रेरित होऊन आपल्या गावातील नद्यांना पुनर्जीवन देण्यासाठी कार्य करावे, असेही त्यांनी सूचविले.
कार्यक्रमाला समाजसेविका अलका दामले, प्रेरणा पावसकर उपस्थित होत्या. ज्योती पडाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अनाम प्रेमचे कार्यकर्ते मीरा सामंत व अँड. सतीश सोनक या वेळी उपस्थित होते. 
----------------------------------------------------------------------------------------------

Monday, March 3, 2014

वैदिक गणित के सोलह सूत्र

जगद्गुरू स्वामी भारती कृष्ण तीर्थ द्वारा विरचित वैदिक गणित अंकगणितीय गणना की वैकल्पिक एवं संक्षिप्त विधियों का समूह है। इसमें १६ मूल सूत्र दिये गये हैं। वैदिक गणित गणना की ऐसी पद्धति है, जिससे जटिल अंकगणितीय गणनाएं अत्यंत ही सरल, सहज व त्वरित संभव हैं। स्वामीजी ने इसका प्रणयन बीसवीं शती के आरम्भिक दिनों में किया।...

From facebook post of Harshvardhan Pandit --
स्वामीजी के एकमात्र उपलब्ध गणितीय ग्रंथ ‘वैदिक गणित' या 'वेदों के सोलह सरल गणितीय सूत्र’ के बिखरे हुए संदर्भों से छाँटकर डॉ. वासुदेव शरण अग्रवाल ने सूत्रों तथा उपसूत्रों की सूची ग्रंथ के आरंभ में इस प्रकार दी है—
1. एकाधिकेन पूर्वेण
2. निखिलं नवतश्चरमं दशतः
3. ऊर्ध्वतिर्यग्भ्याम्
4. परावर्त्य योजयेत्
5. शून्यं साम्यसमुच्चये
6. (आनुरूप्ये) शून्यमन्यत्
7. संकलनव्यवकलनाभ्याम्
8. पूरणापूरणाभ्याम्
9. चलनकलनाभ्याम्
10. यावदूनम्
11. व्यष्टिसमष्टिः
12. शेषाण्यङ्केन चरमेण
13. सोपान्त्यद्वयमन्त्च्यम्
14. एकन्यूनेन पूर्वेण
15. गुणितसमुच्चयः
16. गुणकसमुच्चयः

Sunday, March 2, 2014

राष्ट्रीय विज्ञान दिन - लीना मेहेंदळे व्याख्यान


राष्ट्रीय विज्ञान दिन - लीना मेहेंदळे व्याख्यान
सांगली येथे मराठी विज्ञान प्रबोधिनी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्त गोवा राज्याच्या माहिती आयुक्त लीना मेहेंदळे यांचे विलिंग्डन कॉलेजमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार लेख स्वरुपात संपादित केले आहेत.
कोणत्याही युगाची प्रगति ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असते. वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय आणि आपल्या देशांत ही विज्ञान प्रगती कशी होईल याची चिंता सर्वांनी करावी अशी आज परिस्थिती आहे. प्रत्यक्ष प्रयोगाला विज्ञानात फार महत्व आहे. मला नववीच्या वर्गात असताना भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील माझ्या पहिल्यावहिल्या प्रयोगात एक उत्तम वस्तुपाठ मिळालावर्गात प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाकावर एक चौकोनी ठोकळा व एक मापनपट्टी ठेवली होती. शिक्षकांनी सर्वांना ठोकळ्याच्या बाजूचे माप काय असे विचारले. प्रत्येकाने पट्टीने कोणतीतरी एक बाजू मोजून उत्तर लिहिले. शिक्षकानी सांगितले की केवळ एका बाजूचे एकदाच माप घेतले तर ते प्रयोगांती उत्तर होत नाही. ठोकळ्याच्या सर्व बाजूंची प्रत्येकी किमान तीन वेळा मापे घेऊन त्यांची सरासरी काढली तर अधिक अचूक उत्तर येईल. म्हणून एका बाजूचे माप घेणे याला मापन (Measurement) असे म्हणायचे तर हेच मापन अधिक वेळा करून परिणामाची कन्सिस्टंसी (एकवाक्यता) तपासणे, तसेच सर्व बाजूंची मापे घेऊन सरासरी उत्तर काढणे म्हणजे मापनाचा वैज्ञानिक प्रयोग (Experiment) होय. प्रयोगामधे वारंवार करून पहाण्याला फार महत्व असते. एकदाच केलेले अपुरे किंवा अवैज्ञानिक ठरेल.

डॉ. सी. व्ही. रामन यांनी कलकत्त्यातील छोट्या प्रयोगशाळॆत  प्रयोग करून नोबेल पारितोषिक मिळविले. मात्र त्यांच्या नंतर नोबेल पारितोषिक मिळविलेल्या  सर्व भारतीयांनी परदेशात संशोधन करून असे यश मिळविले. भारतात आता आधुनिक सांगितल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आहेत मात्र नोबेल दर्जाचे  संशोधन का होत नाही याचा विचार व्हावयास हवा. ही स्थिती बदलायला हवी.

भविष्यकाळात भारत हा जगातील सर्वात तरूण देश ठरणार आहे. कारण भारतात १५ ते ३५ वर्षांच्या वयोगटातील लोकांची संख्या जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक असणार आहे. या संधीचा फायदा घेऊन भारताला अग्रेसर करण्यासाठी आपणा सर्वानी, विशेषतः विद्यार्थ्यांनी झटले पाहिजे. शोध घेणे (Investigate), शोध लावणे (Invention), विचार करणे (Think) आणि उपलब्ध ज्ञानाचा योग्य उपयोग करून (Application) संशोधनाचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच विज्ञानातील विविध विद्याशाखात असणारे परस्पर संबंध दृढ करून ज्ञानाची व्याप्ती व उपयुक्तता वाढविली पाहिजे. यासाठी कॉलेज व विद्यापीठांनी मोठ्या संख्येने इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस वाढवले पाहिजेत.

मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. त्यांचे सर्व प्रयोग किरणोत्सर्गाविषयी होते. मात्र त्यांना या संशोधनाबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक  मिळाले होते. हे लक्षात घेतले पाहिजे. याचसाठी विषयांच्या चौकटीत अभ्यास न करता आवश्यकतेनुसार इतर विद्याशाखेतील ज्ञान घेऊन संशोधन परिपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी संबंधित दुसर्‍या विद्याशाखेतील मूलभूत संकल्पनांची ओळख होण्यासाठी कमी अवधीचे शीघ्र प्रशिक्षण वर्ग (क्रॅश कोर्सेसही) आयोजित करण्याची गरज आहे.

संशोधनासाठी आणखी एका गोष्टीची गरज आहे. ती म्हणजे प्रयोगाचे नोंदीकरण (Documentation). संशोधनातील टप्पे, प्रयोगाचे साहित्य, कृती व मिळालेले निष्कर्ष यांची तपशीलवार नोंद ठेवणे अतिशय आवश्यक आहे. आपण भारतीय मंडळी उत्सवप्रिय असतो. एखाद्या वस्तूचे वा संशोधनाचे सादरीकरण वा प्रसिद्धी यासाठी  आपण भरपूर कष्ट घेतो. मात्र अशा प्रयत्नात कार्यक्रम संपला की खंड पडतो. त्यात सातत्य रहात नाही. परिक्षेच्या वेळचा अभ्यास परिक्षा संपल्यानंतर आपण विसरून जातो. सतत आस लागुन रहाणे व प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास आहे. संशोधनाला अशा सातत्याची गरज असते.

भारतात आता बर्‍याच मोठ्या संशोधन प्रयोगशाळा व विज्ञान संग्रहालये उभारण्यात आली आहेत. त्यांना भेटी देऊन नव्या उपकरणांची व विज्ञानशाखांची आपण माहिती घेतली पाहिजे. अशा भेटी दिल्या की आपल्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत मिळते. तसेच दीर्घकालीन दृष्टि तयार होते.

वैज्ञानिकतेचा महत्वाचा निकष म्हणजे प्रयोगाला सैद्धांतिक जोड मिळणे. हायड्रोजन स्पेक्ट्रमवरील प्रयोगांत दिसून आलेल्या बामेर लाइन्सची व्याख्या एका सिद्धांताने करता आली, पण त्याच प्रयोगांत पुढे सापडलेल्या इन्फ्रा रेड रेंजमधील स्पेक्ट्रमची व्याख्या करता येइना, तेंव्हा नवीन धडाडीच्या सिद्धांताची मांडणी करून बोर याने व्याख्या केली आणि अशा रितीने अणुची संरचना जगाला समजून आली.

संशोधनासाठी चिकाटीची आवश्यकता असते. अपयशाने निराश न होता चिकाटीने प्रयत्न चालू ठेवल्यास यश मिळते. पॉझिट्रॉनचा शोध लावण्यासाठी,  वैश्विक किरणात पॉझिट्रॉन असण्याची शक्यता गृहीत धरून एका शास्त्रज्ञाने (बहुधा ब्लेक किंवा अँडरसन) 1920 ते 1930 या कालखंडात क्लाउडचेंबरवर वैश्विक किरणांच्या मार्‍याचे तब्बल ६०००० फोटों काढले व त्यांचे परिक्षण केले त्यात त्याला एका फोटॊत पॉझिट्रॉनचा मार्ग नोंदला गेल्याचे आढळले. एवढी चिकाटी ठेवली म्णून पॉझिट्रॉनचा शोध लागू शकला.

मायकेल्सन याने प्रकाशाचा वेग मोजला. मात्र प्रकाशाच्या संवाहनासाठी इथर नामक माध्यम असावे लागते अशी धारणा होती व या इथरचे अस्तित्व पकडण्यासाठी- समजून येण्यासाठी त्याने एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची संकल्पना मांडली. ती मला नेहमी थक्क करून सोडते. या प्रयोगातून त्याला प्रकाशाचा वेग अचूकपणे नोंदवता आला त्याचबरोबर इथर किंवा त्यासदृश काहीही असूच शकत नाही - असते तर माझ्या उपकरणांनी त्याचे अस्तित्व पकडले असते असे तो ठामपणे सांगू शकला - त्यातून पुढे आईनस्टाईनने रिलेटिव्हिटीचा अभूतपूर्व सिद्धांत मांडला. या प्रयोगांसाठी मायकेल्सनने जी सूक्ष्म संवेदनशील उपकरणे विकसित केली होती त्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. पण मला विचाराल तर त्याच्या प्रयोगासाठी आवश्यक कल्पनाभरारीसाठीही त्याला पारितोषक मिळायला हवे होते. अशी कल्पनाभरारीच विज्ञानाला पुढे नेऊ शकते.

माझ्या पहिल्या विज्ञानप्रयोगाविषयी तुम्हाला सांगितले.   हा प्रयोग झाल्यावर दुसर्‍या दिवशी शिक्षकांनी असाच प्रयोग पट्टीच्या सेंटीमीटरऎवजी इंचाची बाजू वापरून करावयास सांगितले. इंचाचा दहावा भाग मिलिमीटरपेक्षा कितीतरी मोठा असल्याने ठोकळ्याची बाजू मोजताना त्याची कड दोन भागचिन्हांच्या मधे येण्याची शक्यता अधिक होती अशा वेळी मधल्या मोकळ्या जागेचे काल्पनिकरीत्या दहा भाग कल्पून अंदाजे मापन (Approximation) करता येते - नव्हे तसे करायला शिकून घ्यायचे असते - हे ठसवण्यासाठी तो प्रयोग होता. या अंदाज घेण्याच्या पद्धतीचा उपयोग सामाजिक शास्त्रात सार्वमताचा कौल अजमावण्यासाठी केला जातो. तसेच तुमच्या कित्येक गणितांमधे अचूक संख्येची गरज नसून जवळपास काय उत्तर असेल तेवढा अंदाज घेऊन पुरतो - अशा वेळी आपल्याला Approximation करता यायला हवे

सर्व शोधांची जननी जिज्ञासा आहे. जिज्ञासा पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद संशोधनाला प्रेरणा देतो. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास न ठेवता त्याचे कारण जाणून घेण्याची प्रवृत्ती, कां व कसे हे दोन प्रश्न सतत विचारत रहाणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन होय. मात्र हे कारण शोधण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करणे जरूर आहे. दुसर्‍यांच्या निष्कर्षावर अवलंबून राहू नका.

सध्या भारतात असे आढळते की पूर्वी सिद्ध झालेले प्रयोगच संशोधनासाठी बर्‍याच वेळी निवडले जातात. यात पैसा व श्रम खर्च होऊन प्रत्यक्ष नवे संशोधन होत नाही. यासाठी पुनः चाकाचा शोध लावण्याचा प्रयत्न करू नका. मायकेल्सन प्रमाणे नव्या धर्तीचे प्रयोग मांडायला शिका.

या ठिकाणी मला अजून मांडावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे अध्यात्म व विज्ञान यांचा विचार. भारतीय तत्वज्ञान अध्यात्माकडे नेणारे असून त्यात वैयक्तिक अनुभूतीला महत्व दिले जाते तर  विज्ञानात वैयक्तिक अनुभूतीला स्थान नाही. म्हणजे भारतीय तत्वज्ञान किंवा अध्यात्म हे अवैज्ञानिक म्हणायचे का? यावर अधिक वाचन केल्यावर मला या दोहोतील साम्य लक्षात आले व अध्यात्मातील वैज्ञानिकता कुठे आहे तेही उमगले. ते इथे थोडक्यांत मांडणार आहे.

भगवान बुद्धाला कोणीतरी विचारले की मला तुमच्या सारखा "बोधीचा" - खर्‍या ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. बुद्धांनी  त्याला त्याचे राहण्याचे गाव विचारले. ते सांगितल्यावर बुद्ध म्हणाले ‘तू येथून तुझ्या गावाला जाईपर्यंत  वाटेत नदी, डोंगर,  जंगल इत्यादि काय काय लागते ते सांग.’ त्याचे वर्णन ऎकल्यावर बुद्धानी त्याला प्रश्न केला की ‘ तू त्या रस्त्याने जाण्याऎवजी दुसर्‍या रस्त्याने वाटचाल केलीस तर गावापर्यंत पोचशील काय ?’ या प्रश्नाला त्या व्यक्तीने ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा बुद्ध म्हणाले की मी ज्ञान मिळविण्यासाठी कशी वाटचाल केली हे सांगू शकतो मात्र ज्ञान प्रत्यक्ष काय मिळाले याची अनुभूती फक्त ‘मलाच’ म्हणजे ‘जो या वाटेने जाईल त्यालाच’  होऊ शकते. मी फक्त वाट सांगू शकतो - प्रत्यक्ष बोधी तुलाच मिळवावी लागेल.

याचा अर्थ असा की अध्यात्म्यात प्रगती करण्याचा मार्ग निश्चित असतो. आधुनिक भाषेत बोलायचे तर "प्रोसेस" निश्चित असते, मात्र अनुभूती वैयक्तिक असते. विज्ञानातही प्रयोग-कृती निश्चित असते मात्र येणारे निष्कर्ष प्रत्येकाला सारखेपणाने मिळू शकतात तर अध्यात्मात ते वेगळे येऊ शकतात. तरीही प्रयोग-कृती किंवा प्रोसेस ही निश्चितपणे सारखी असून प्रत्येकाला करता येते आणि प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय सिद्धता येत नाही या दोन कारणांसाठी भारतीय तत्वज्ञान हे देखील वैज्ञानिकच आहे असे माझे मत आहे. एकूण प्रोसेसवरूनही विज्ञानप्रयोगाचे मूल्यमापन होतेच.

विज्ञानात प्रगती करण्यासाठी प्रश्न विचारा. आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी घटनेच्या कारणांचा शोध घ्या. त्यासाठी प्रयोग करा. प्रयोगातील पद्धतीची व निष्कर्षांची तपशीलवार नोंद ठेवा. निश्चित स्वरुपाचा निष्कर्ष मिळेपर्यंत चिकाटीने प्रयत्न करा. विज्ञानात नवे संशोधन करण्याचे, त्याचा तंत्रज्ञानात आणि इतरत्र उपयोग करण्याचे स्वप्न बाळगा.

या वर्षाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतात वैज्ञानिक क्रांती करण्याचे आपण ठरवू या.
(शब्दांकन डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली)
----------------------------------------------------------------------------------------------

Saturday, December 28, 2013

challenges for HR in the coming year:

In the current business environment, setting goals for employees is crucial. Senior executives tell ET what they see as the biggest challenges for HR in the coming year: 
Anuranjita Kumar, Country Human Resources Officer, Citi India 

Doing More with Less 

In the current economic environment, productivity, innovation and efficiency are key. Specialists with an in-depth understanding of a business/vertical yet possessing the versatility to do more and differently will be in demand. Organisations are developing focused capability interventions that are tightly tied to business outcomes. 

Engaging All 

For an organisation to be able to perform in the current competitive l .. 

Wednesday, October 9, 2013

प्रशासनात संगणक कसा आणि किती --सा. विवेक मूळ लेख


प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा

प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा
सा. विवेक, दिवाळी अंक  दिवाळी १९९७

आज सबंध जगभर संगणक हा परवलीचा शब्द झाला आहे. मात्र अजूनही आपल्या शासकीय कार्यालयांमध्ये याचा म्हणावा तसा वापर व उपयोग होत नाही. कारण संगणकाबाबत शासकीय कार्यालयांमध्ये काही गैरसमज आहेत. त्याच प्रमाणे गेल्या दहा वर्षांत संगणकाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली, जी नवीन मशीन्स समोर आली, आणि जो सोपेपणा निर्माण झाला,  त्याची जाणीव शासकीय कार्यालयात फार कमी लोकांना आहे. शासकीय कामकाजात संगणक नेमका कसा वापरावा याचा व्यवस्थित अंदाज शासकीय कार्यालयांनी घेतलेला नाही. संगणक हा विज्ञानाच्या प्रगतीतील एक महत्वाचा टप्पा असल्याने त्याचा वापर मोठया वैज्ञानिक कामगिरीसाठी करतात, हे सर्वसाधारणपणे कोणालाही माहीत असते. त्यासाठीच मोठया मोठया संगणक कंपन्या संशोधन करीत असतात. तरीही शासकीय कार्यालयामध्ये संगणकाचे मार्फत काम करावयाचे असल्यास संगणकाबाबत वैज्ञानिकांना शिकाव्या लागतील अशा किमान ९० टक्के गोष्टी तरी शासकीय कार्यालयात न शिकून चालतात. शासकीय वापरासाठी संगणकावावत फार कमी गोष्टी शिकल्याने काम भागते. ही बात केंव्हाही लक्षात घेतली जात नाही.
प्रशासकीय कामाच्या उलाढालीसाठी संगणकाबाबत काय काय शिकावे याचे एक सोपे उत्तर म्हणजे विंडोज । ही आदेश प्रणाली व त्या अनुषंगाने येणारे एम.एस.ऑफीस हे सॉफ्टवेअर. अर्थात इतरही काही छोटया मोठया बाबी शिकून घ्याव्या लागतात त्यांचा उल्लेख ओघाने होईलच. मात्र संगणकाबद्दल काय काय शिकावे या बरोबरच किती जणांनी शिकावे हा प्रश्न महत्वाचा आहे. सर्वसाधारण समजूत अशी असते की, कार्यालयातील एखाद दुस-या व्यक्तीला संगणक वापरता आला म्हणजे पुरे. माझा कित्येक वर्षांचा अनुभव याच्या अगदी उलट आहे. हा अनुभव पश्च्िाम महाराष्ट्र विकास महामंडळ, यशदा, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था व विभागीय आयुक्त नाशिक चा सर्वच कार्यालयांमध्ये आला. परंतु याची सत्यता जमाबंदी आयुक्त या पदावर काम करीत असताना ठळकपणे अनुभवाला येत आहे कारण या कार्यालयात संगणकीकरण हे फक्त कार्यालयापुरतेच करावयाचे नसून सर्व जमिनींचे अभिलेख संगणकावर टाकण्याचा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हा पातळीवर पूर्णपणे राबवायचा आहे.
शासकीय कार्यालयात संगणकाचा वापर होत असताना लक्षात ठेवण्याचा पहिला नियम हा की आपल्या समोरील संगणकाचा वापर आपणास चक्क पाटीपेन्सील प्रमाणे करता आला पाहिजे. पाटीवर कोणीतीही गोष्ट आपण दहादा पुसतो व पुन्हा दुरूस्त करतो. आधी उत्तम प्रकारे कागदावर काढून घेऊ व त्यावरून बघून पाटीवर काढू असा विचार करत नाही हाच नियम संगणकासाठी वापरायचा असतो. या उलट कार्यालयात सर्वाची समजूत अशी असते की संगणकावर जी माहिती भरावयाची ती एखाद्या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून, तयार करून, त्याला अंतिम रूप रेषा देऊन मगच संगणकावर टाकायची. म्हणचे मुळांत संगणकाने जी सोय केली तिचा फायदाच करून घ्यायचा नाही असला प्रकार.
संगणकात वापरतांना काही पारंपारिक शब्द समजून घेणे योग्य ठरेल. हार्डवेटर किंवा जडवस्तूप्रणाली म्हणजे संगणकातील आपल्या समोर येणारे यंत्रभाग. यात मुख्यतः स्क्रीन (मॉनीटर, याला आम्ही चक्क संगणकाची पाटी म्हणतो ), की बोर्ड व मुख्य मशिन यांचा अंतर्भाव आहे. मुख्य मशीन मधेच संगणकाचा सीपीयू अर्थात्‌ संगणकाचा मेंदू असतो. माहिती साठवण्याची साधने म्हणजे फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, टेप किंवा सी.डी. यांच्यावरुन  मेंदूला  माहिती  घेता  यावी यासाठी ड्राइव्हज व कनेक्टींग पोर्ट असतात. की बोर्ड




बरोबरच माऊस  (आमच्या घरात याचा उल्लेख उंदिर किंवा मूषक असाच  असतो)  या  यंत्राचा  उपयोग  केला
जातो. की बोडंवर सर्व आदेश प्रत्यक्षात टाइप करून द्यावे लागतात. त्या ऐवजी माउस वापरून कित्येक आदेश सोपेपणाने देता येतात. त्यामुळे कामाचा वेळ वाचतो. संगणक विकत घेतांना डीलर बरोबर चर्चा करतांना कांय तपासायचे असते यासाठी खालील चार्ट लक्षात ठेवला तर पुरे
हार्डवेअर विकत घेताना :-
१) सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (क्घ्छ) :-
      ठ्ठ) मदर बोर्ड - स्टॅण्डर्ड कंपनीचा असावा.
      ड) चिप - त्या त्या काळातील लेटेस्ट तसेच जास्तीत जास्त स्पीड असलेली घ्यावी ही स्पीड सध्या मिलियन हर्ट्झ (ग्ण्) मध्ये मोजतात.
      ड़) रॅम मेमरी - लेटेस्ट मॉडल प्रमाणे रॅम मेमरी असावी मदरबोर्डावर रॅम मेमरी वाढवण्यासाठी सोय असावी ग्ए किंवा क्रए मध्ये मोजतात.
२) पाटी म्हणजेच स्क्रीन किंवा मॉनीटर
      ठ्ठ) हार्ड डिस्क - संगणकात भरलेली सर्व माहिती इथे साठवली जाते ही जास्तीत जास्त असावी .
      ड) फलॉपी -
      ड़) सीडी -
      ड्ड) टेप -           यापैकी ज्यांचा वापर करायचा असेल त्यांचा ड्राइव्ह आपल्या संगणकात असावा लागतो
      ड्ढ) व्ही सीडी -
      ढ) यू एस बी -
४) कनेक्टिंग पोर्टस - किती असतील ते डीलर सोबत ठरवावे किमत माऊस, प्रिंटर, स्कॅनर, युएसबी, इंटरनेट यांची सोय असावी तसेच साउंड सिस्टम ची सोय असावी.
मदर बोर्ड कोणत्या कंपनीचा व कोणत्या जेनेरेशनचा आहे.  चिपची स्पीड कांय, रॅम मेमरी किती आहे, हार्ड डिस्क किती गीगाबाइटची आहे, सीडी ड्रायव्ह तसे सीडी ड्राइव्ह आहे का नाही, पाटी कोणत्या कंपनीची आहे, कनेक्टींग पोर्टस्‌ किती आहेत हे परवलीचे प्रश्न ठरतात.
वरील सर्व वस्तु डोळयांना दिसतात म्हणूनच त्यांचे नाव जडवस्तू किंवा हार्डवेअर. मात्र संगणकाने काम करण्यासाठी त्याला आदेश द्यावे लागतात. त्यासाठी एक तर्कशुद्ध आदेश प्रणाली असते. या प्रणालीचा वापर करून पुढील वेगवेगळ्या टप्प्यांत संगणकाचे काम विकसित करतात. या सर्व डोळयाना न दिसणा-या परन्तु वैचारीक दृष्टया मेहनतीने कराव्या लागणा-या कामास साफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणतात. संगणकाचा वेअर अंतिम वापर ज्या व्यक्तिने करावयाचा त्याच्या हातात कोणते सॉफ्टवेअर दिले जाते, त्याला किती माहिती दिली जाते व त्याला ती प्रत्यक्षात किती वापरता येते यावर संगणकाचा उपयोग अवलंवून असतो. सॉफ्टवेअर या सर्वसमावेशक शब्दासाठी संगणक प्रणाली असा मराठी शब्द वापरता येईल.
संगणक करू शकतो त्या कामांचे साधारण सहा भाग पाडता येतील. पहिला त-े  लेखन किंवा चार्ट तयार करणे, दुसरा गद्य लेखन, तिसरा नकाशे व चित्र काढणे, चौथा अत्यंत वरच्या पातळीवरील गणिते सोडविणे, पाचवा इतर उच्च प्रतीच्या वैज्ञानिक संशोधना साठी मदत करणे, सहावे काम म्हणजे मॉडेल अँनिमेशन व कॉम्प्यूटर ग्राफिक तयार करणे. या पैकी शासकीय कामकाजात फक्त पहिली दोनच कामे करावी लागतात. क्वाचित प्रसंगी काही कार्यालयांना तिस-या कामाची आवश्यकता पडते. शेवटची तीन कामें ही जर संगणकासाठी एम.ए. परीक्षेच्या तोडीची मानली तर तुलनेले पहिली तीन कामे ही सातवीच्या परीक्षेच्या तोडीची आहेत.

संगणकामधील तज्ञ व संशोधक मंडळी सर्वसाधारणपणे शेवटच्या तीन कामांबद्दल जास्त चर्चा करीत असतात. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांची अशी समजूत होते की, संगणक शिकण्यासाठी आपल्याला देखील तेवढे जास्त प्रयत्न करावे लागतील.
पहिल्या दोन प्रकारची कामे करण्यासाठी संगणकास नेमके कराय करावे लागते हे थोडक्यात सांगते. संगणकाचे सॉफ्टवेअरमध्ये सर्वप्रमुख टप्पा म्हणजे आदेशप्रणाली. सध्या जगात वापरण्यात येणा-या आदेश प्रणाली म्हणजे डॉस, विंडोज, यूनिक्स्‌. या पैकी साध्या डॉस ही सर्वात जास्त वापरात आहे. मात्र त्याच सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली विंडोज ही प्रणाली लौकरच जास्त पुढे येईल.
आदेश प्रणालीच्या मदतीने आपण संगणकास मूलभूत आदेश देऊ शकतो. उदा. प्रिंट काढ, कॉपी कर, नवीन फाइल उघड, अमूक फाइल पुसून टाक, तुझ्याकडील सर्व फाइल्सची यादी दाखव, इत्यादि! हे असे वीस-पचवीस आदेश या आदेश- प्रणाली माफर्त दिले जातात. हे एवढेच आदेश कसे द्यावेत हे शिकून येणे गरजेचे असते या पलीकडे आदेश प्रणाली जी इतर खूप कामे करते त्यामधे आपण लक्ष घालण्याची गरज नाही.
सॉफ्टवेअर मधील दुसरा टप्पा म्हणजे संगणकीय भाषा. आपण सामान्यपणे भाषा हा शब्द ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने संगणकीय शब्दकोषात हा वापरत नाहीत. मानवी भाषा ज्या त्या मानवी समूहाच्या  भौगोलीक व सांस्कृतिक विकासातून घडली. तर संगणकीय भाषा मुख्यतः संगणकाकडून वर नमूद केलेल्या सहांपैकी कोणते काम जास्त प्रामुख्याने करावयाचे याचा विचार करून त्या दृष्टीने विकसीत झाली. आपल्या

कानावर पडलेली काही संगणकीय भाषांची नावे म्हणजे बेसीक, कोबोल, फोरट्रान, व सध्या सर्वाधिक वापरात असलेली सी प्लस प्लस!
आदेश प्रणाली व भाषा यांचा वापर करून त्यामध्ये प्रोग्रामिंग करून संगणकाचे एखादे सॉफ्टवेअर पॅकेज विकसीत केले जाते. सामान्यपणे आपण ऐकलेली पॅकेजेस म्हणजे लोटस, एम.एस.ऑफिस इत्यादि! आपल्या कार्यालयापुरते काम भागू शकेल असे पॅकेज जर आपल्याला मिळाले तर आपल्या संगणकाची भाषा किंवा त्यासाठी वापरलेले प्रोग्रामिंग शिकून ध्यावे लागत नाही. प्रोग्रामिंग मधील हा पहिला टप्पा, म्हणजे भाषेपासून पॅकेज विकसीत करणे अतिशय अवघड असते. त्यासाठी मोठया मोठया कंपन्यांना मोठी गुंतवणूक करून तसे पॅकेज तयार करून ध्यावे लागते. अगदी पूर्वी म्हणजे सत्तर ऐशीच्या दशकांत संगणकामधे फक्त भाषा दिलेली असे व प्रत्येक कार्यालयाला स्वतःचे प्रोग्रामिंग लिहून काढावे लागे. तेंव्हा सर्वांना संगणक शिकवणे कठिण होते. संगणकाचा इतिहास लिहितांना शासकीय ऑफिसात किती प्रोग्रॅमिंग करावे लागत असे असा प्रश्न विचारला तर सत्तरीच्या दशकांत ९५ ऽ पण नव्वदाच्या दशकांत फक्त २ऽ असं म्हणावे लागेल.
कोणत्याही शासकीय कार्यालयात त-े लेखन व गद्य लेखन ही दोन्ही कामे प्रामुख्याने वेळ खाणारी असतात. गद्य लेखनामधे पत्रव्यवहार, नोट्स, रिपोर्टींग अशा सर्व बाबींचा समावेश होतो. कच्चे टायपिंग करणे, तपासून पहाणे, त्यांत बदल करावयाचा झाल्यास पुन्हा सर्व टायपिंग करणे वगैरे गोष्टी कार्यालयांत सतत लागतात. टाईपरायटर वर तत्काळ कागदावर उमटत असल्याने चुका झाल्यास सुरवातीपासून शेवटपर्यत पुन्हा सर्व टायपिंग करावे लागते. ते करतांना नवीन चुका होण्याची शक्यता कायम उरते. त्याऐवजी संगणकावर काम केल्यास सुरवातीला ते फक्त संगणकाच्या पडद्यावर  दिसते. पडद्याचा आपण अक्षरशः पाटी पेन्सील सारखा वापर करू शकतो. आपल्याला हवा तेवढयाच शब्दापुरत्या दुरूस्त्या करणे, परिच्छेद एका जागेवरून उचलून दुस-या जागेवर नेणे, सुबक टायपिंग, हवे ते टायपिंग, शब्दांचे आकार-प्रकार बदलणे इ. कित्येक गंमती जमती गद्य लेखनांत करता येतात, जेणेकरून झालेले काम कमी वेळेत, कमी श्रमात सुबकपणे होते. कोणत्याही कार्यालयात गद्य लेखनासाठी एकूण खर्च होणा-या वेळेपैकी सुमारे साठ टक्के वेळ संगणकाचा वापर करून वाचवता येतो. आज

शासकीय कामाचा उरक होण्याच्या दृष्टीने वेळ वार्चावणे हे अतिशय महत्वाचे ठरत आहे. तरी देखील गद्य लेखनामधील सर्व सोईचा तसेच वेळ व श्रम वाचविण्याचा अनुभव ज्यांनी स्वतः घेतलेला नाही ते नेहमीच टाईपरायटरची किंमत व संगणकाची किंमत याची तुलना करतात. दहा हजार रुपयांपर्यत टाईपरायटर मिळत असतांना साठ ते सत्तर हजाराचा संगणक कार्यालयासाठी ध्यावा कां असा प्रश्न वारंवार विचारला जातो. माझ्यामते गद्य लेखनाचे काम संगणकावर टाकल्यामुळे जेवढा वेळ वाचणार असतो त्याचा विचार करता जुने टाईपरायटर असले तरी ते बाजूला सारून नवीन संगणक विकत घेणे ही अत्यंत परवडणारी बाब आहे.
भाजेनंतरचा टप्पा म्हणजे प्रोग्रमिंग विशेषतः तक्ता लेखनासाठी.  सुरवातीस लोटस त्यानंतर फॉक्सप्लस व नंतर एम्‌ एस्‌ ऑफिस मधील एक्सेल ही पॅकेजेस विकसित झाली. संगणक येण्याआधी वर्षानुवर्ष कार्यालयांतील विविध कर्मचारी त्यांच्याकडील माहीती निरनिराळी रजिस्टर्स आखून त्यामध्ये भरून घेत व या माहितीचा वापर करत. रजिस्टरचे स्वरूप कसे असावे हे कधीतरी एखादा सूज्ञ अधिकारी किंवा कर्मचारी आखून देत असे. पुढे रजिस्टरचा हा नमूना रूढ व लोकप्रिय होऊन सगळीकडे वापरला जाई. थोडक्यात आपल्याकडील माहिती एका विशिष्ट स्वरूपाच्या तक्त्यामध्येच भरली जाते. एकदा आखून दिलेल्या तक्त्याचा नमुना वारंवार बदलणे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे कित्येकदा जुन्या नमुन्यातील त-े हवी ती माहिती कार्यक्षमतेने देत नाही हे समजत असून सुद्धा तक्त्याचा नमुना बदलण्यास कोणी तयार नसतात. म्हणून शासनात दर दहा - पंधरा वर्षांनी रजिस्टरांचे नमुने ठरवण्यासाठी वेगळी टीम बसवली जाते.  त्याच प्रमाणे
तक्ता लेखनासाठी संगणक वापरायचा झाल्यास संगणकाच्या रजिस्टरचा नमुना कसा असावा, त्यामध्ये माहिती कशा प्रकारे भरली जाईल, ती माहिती आपल्याला कागदावर प्रिंट करून ध्यायची असेल तर त्याचा नमूना काय राहील हे सर्व ठरवून संगणकात माहीती भरावी लागते. संगणकात माहिती भरणे, ती संगणकाच्या वेगवेगळया फोल्डर व फाईल्स मध्ये साठवणे व संगणकातून बाहेर काढणे यासाठी प्रोग्रामिंग करणे गरजेचे असते! कार्यालयाने किती प्रोग्रॅमिंग करावे किंवा शिकावे हे महत्वाचे असून कार्यालय प्रमुखाने समजून घेतले पाहिजे आदेश प्रणाली तयार करण्याच्या तुलनेत हा बराच सोपा असतो. संगणकाच्या सुरवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या लोटस या सॉफ्टवेअरच्या तुलनेत फॉक्स प्रो वापरतांना करावे लागणारे प्रोग्रॅमिंग जास्त सोपे तर एक्सेल साठी जवळ जवळ नाहीच. पूर्वीचे प्रोग्रॅमिंग शिकून घेणे अवघड नसले तरी एखाद्या बुद्धीमान कर्मचा-यास ते शिकण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ लागणे हे स्वाभाविक मानले जाई. त्यामुळे कार्यालयातच प्रोग्रामिंग करता येण्यासाठी तज्ञ माणूस असणे आवश्यक ठरत होते. शासनात अशा तज्ञ माणसाला नेमणे वगैरे बाबी ब-याच वेळखाऊ असतात! त्या कराव्या का? नवीन पद निर्माण करायला शासनात नेहमी अडचणी असतात. मात्र त्यानंतर निघालेली फॉक्सप्लस व एक्सेल ही पॅकेजेस्‌ प्रगत असल्याने बरेचसे प्रोग्रामिंग त्या पॅकेजमध्ये केलेले असते. त्यामुळे तक्ता लेखनातील माहीती भरणे, माहिती काढणे या बाबीसाठी लागणारे कमी प्रतीचे प्रोग्रामिंग कार्यालयातील सामान्य कर्मचारी देखील दहा दिवसात व्यवस्थित शिकून घेऊ शकतो. हे शिकवण्यासाठी सुद्धा फार मोठया तज्ञ माणसाची गरज भासत नाही. कार्यालयातील एखाद्या अधिकारी किंवा कर्मचा-यास हे येत असेल तर इतर कर्मचारीही ते चटकन शिकून घेऊ शकतात.
संगणकात माहिती भरणे या जोडीला संगणकाने त्याच्या हार्ड डिस्कमध्ये माहिती कशी साठवावी हाही एक शिकाण्याचा विषय आहे. यास फाईल मॅनेजमेंट म्हणातात. कित्येक कार्यालयात अशी भूमिका घेतली जाते की, संगणकात साठविलेली माहिती कोणालाही दिसू नये. त्यात कोणालाही बदल करता येऊ नये. त्यातून जी माहिती कागदावर प्रिंट करावयाची ती एका विशिष्ट नमुन्यातच असावी वगैरे. असा आग्रह असेल तर संगणकात माहिती साठविणे व ती माहिती ठराविक पद्धतीने बाहेर काढणे यासाठी खास प्रोग्रामिंगची गरज पडते व ते तज्ञाकडून

करून घ्यावे लागते.  परंतु असा आग्रह धरला नाही व असलेल्या पॅकेजमध्ये माहिती साठवण्याचे जे बाळबोध  तंत्र अंतर्भूत केलेले असते ते चालत असेल तर कोणत्याही कार्यालयात प्रोगामिंग न शिकता तक्ता लेखन व फाईल मॅनेजमेंट अत्यंत कार्यक्षमतेने करून घेता येतो.
संगणक प्रणालीचा विकास
आदेश प्रणाली व भाषा (सर्वोच्च टप्पा) - प्रोग्रामिंग लेव्हल 1 (कठिण व वैज्ञानिक पद्धतीचे, कार्यालयांत तयार करणे जवळपास अशक्य)
तक्ता- लेखन पॅकेज      - प्रोग्रामिंग लेव्हल २ (सल्लागारांच्या मदतीने कार्यालयांत शक्य)
विशिष्ठ साठवण व्यवस्था      -
(च्द्रड्ढड़त्ठ्ठथ् ढत्थ्ड्ढ थ््रठ्ठदठ्ठढ़ड्ढथ््रड्ढदद्य द्मन््रद्मद्यड्ढथ््र)    

सामान्य प्रकारची साठवण व्यवस्था        प्रोग्रामिंग लेव्हल ३ (कर्मचा-यास सहज शक्य)
------०००--------------
शासकीय कार्यालयात गद्य लेखनाचे काम सुमारे ३० टक्के, तक्ता लेखानचे काम ४० टक्के व प्रत्यक्ष फाईलचा अभ्यास करून त्यावर कारवाई व निर्णयाचे ३० टक्के असते. या वरून गद्य लेखनाचे कामापेक्षा तक्ता लेखनाचे काम जास्त महत्वाचे आहे हे कळून येते. शिवाय वरिष्ठ अधिका-यांना घ्यावे लागणारे कित्येक निर्णय तक्त्यांच्या वापरामुळे सोईचे होतात. मात्र अजूनही शासनात जे जे संगणक आहेत त्यांचा वापर मुख्यतः गद्य लेखनासाठीच होताना दिसून येतो, तक्ता लेखनाच्या विषयाकडे कुणी फारसे लक्ष दिलेले नाही.
सर्व शासकीय कार्यालयात संगणकाबाबत भिती व गैरसमजूती आहेत. उदा.
1. संगणकावर जे लिहायचे ते पूर्ण विचार करून व अंतिम निर्णय घेऊन त्याला अंतिम स्वरुप देऊन मगच लिहायचे कारण एकदा लिहीलेले बदलून चालत नाही.
२. ज्या कार्यालयात जेवढे जास्त संगणक ते कार्यालय जास्त श्रेष्ठ.
३. संगणक दोन तीन लोकांनीच वापरावा. कार्यालयातील सर्वाना तो येण्याची गरज नाही.
४. कोणत्याही कार्यालयात दोन क्लार्क व क्वचित प्रसंगी कार्यालय प्रमुख यांनी संगणक शिकण पुरेसे
       आहे. मात्र पर्यवेक्षक किंवा मधल्या फळीच्या अधिका-यांनी संगणक शिकणे गरजेचे नाही.
५. संगणकावर माहिती साठविण्यासाठी मोठया प्रमाणात प्रोग्रामिंग यावे लागते. सबब ते काम एखाद्या
       सल्लागार संस्थेच्या हातात सोपविलेले बरे.
६. संगणकातून माहिती बाहेर काढताना त्याच्या नमुन्यात वारंवार बदल करणे योग्य नाही.
७. संगणकावरील माहिती जितकी गोपनीय तितके उत्तम.
८. संगणकावरील माहिती कुणालाही बदलता येऊ नसे यासाठी ती बाहेरील संस्थेच्या ताब्यात असावी.

वगैरे वरील गैरसमजूती कर्मचा-यांच्या मनांतून काढून टाकणयासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. उदा. त्यांचे प्रशिक्षण करणे, सर्वानी संगणकावर प्रत्यक्ष काम करणे किती सोपे आहे हे दाखवून देणे, त्यांचेकडून संगणकावर काम करून घेणे. संगणकाबाबत कर्मचा-यांच्या मनात मोठया प्रमाणात भिती असते. तो त्यांच्या मनोवृत्तीचा भाग आहे. एखाद्या अंधा-या खोलीत भूत आहे या समजुतीने त्याची जशी भिती वाटावी तशीच भिती संगणक हाताळताना कर्मचा-यांच्या मनात असते. ही उपमा मी या साठी दिली की, त्यांची भिती कमी करण्यासाठी नेमका यावर आधारीत उपायच मी वापरला. संगणकाचे प्रशिक्षण देताना शक्यतो एकाच कर्मचा-यास देण्यापेक्षा

तीन चार कर्मचा-यांना एकाच वेळी बसून, संगणक शिकू दिला तर परस्परांच्या उपस्थितीत संगणकाची भिती जाते असा माझा अनुभव आहे.
------०००--------------
या ठिकाणी जमाबंदी आयुक्त कार्यालयात फॉक्सप्लस हे पॅकेज वापरून कर्मचा-यांना कसे प्रशिक्षण दिले व काम वेगाने होण्यासाठी त्याचा नेमका कसा उपयोग झाला हा अनुभव विस्ताराने सांगणे योग्य ठरेल. फॉक्स प्लस हे प्रगत पॅकेज असून त्या द्वारे कोणतीही गुप्तता न बाळगण्याची पद्धत वापरून पॅकेजमध्ये दाखविल्या प्रमाणे फाइल मॅनेजमेंटची  पद्धत वापरली. हे अतिशय सोपे असून कर्मचा-यांना २ ते १० दिवसात शिकता आले. या साठी कर्मचा-यांना फक्त क्रीएट स्ट्रक्चर, मॉडीफाय, सेव्ह, डिलीट, सॉर्ट, प्रिंट, लिस्ट, तसेच एखादा नवा कॉलम तयार करणे किंवा जुन्या कॉलमची जागा बदलणे हे आदेश फॉक्सप्लासच्या भाषेत संगणकास कसे द्यावयाचे एवढेच शिकावे लागले. अर्थातच या खेरीज डॉस या आदेश प्रणाली मधील काही महत्वाचे आदेश शिकावे लागले. तसेच हार्डवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे काय हे ही शिकावे लागले॥।
------०००--------------
कोणत्याही क्लार्कने केलेल्या कामाचा तात्काळ वापर त्याचे हेडक्लार्क, डेस्क ऑफिसर व सेक्शन ऑफिसर यांनी करावयाचा असतो. एखाद्या क्लार्कने संगणकासमोर बसून नेमके काय केले व जे काही केले त्याचा वापर कामाचा उरक पाडण्यासाठी नेमका कसा झाला आहे हे जर या वरिष्ठ अधिका-यांना कळले नाही तर कलार्कच्या कामात सुधारणा करणे, मार्गदर्शन करणे इ. कामे त्यांना करता येणार नाहीत. त्यामुळे वरीष्ठ श्रेणीतील क्लास 1 अधिका-यांपासून तर हेडक्लार्क पर्यंत सर्वानाच संगणकाचे प्रशिक्षण द्यायला हवे. क्लार्कने तयार केलेल्या तक्त्यामध्ये संगणकाची क्षमता लक्षात घेऊन कुठले बदल करावे याचे प्रशिक्षण त्यांना द्यावे लागेल. तसेच कार्यालयासाठी नवीन संगणक घ्याचा असेल तर त्याचे स्पेसिफिकेशन काय असावे? बाजारात चालू ट्रेंड काय आहे? योग्य किंमत कशी ओळखावी किंवा ठरवावी या बाबतचे प्रशिक्षण देखिल कार्यालयातील वरीष्ठ अधिका-यांना असले पाहीजे. नाहीतर त्या कामाची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखावर येऊन पडते व त्याचा वेळ फुकट जातो. मात्र याच न्यायाने सर्वात जास्त प्रशिक्षण कार्यालय प्रमुखास द्यावे लागते. कारण त्याने संपूर्ण कार्यालयाला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असते.
गेल्या पंधरा वर्षात संगणकाबाबत सर्व प्रगत संकल्पना व उपयोग शिकून घेण्याची संधी मला मिळाली. या साठी क्ज़्घ्ङच्, ग़्क्ख््र, ग़्क्ष्क् तसेच ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सीटी (इंग्लंड) येथील संगणकाचे कोर्सेस व माझी स्वतःची आवड यांचा महत्वाचा वाटा आहे. या मुळेच संगणकाच्या जगात वापरात असलेली जुनी पॅकेजेस सर्वसामान्य कर्मचा-यास शिकून घेण्यासाठी कशी कठिण व नवीन पॅकेजेस कशी सोपी हे मला तात्काळ समजू शकले. त्याचबरोबर असेही लक्षात आले की, एखाद्या कार्यालयांत पहिल्यांदा संगणक आणला जातो तेव्हा काही संगणक सल्लागार त्या कार्यालयातील सर्व कामासाठी सिस्टीम स्टडी करून देऊ व फाईल मॅनेजमेंटसाठी एक उत्तम प्रोग्राम तयार करून देऊ असा प्रस्ताव देतात. फाईल मॅनेजमेंट ची पद्धत तयार करताना तर त्यात खूप क्लिष्टपणा आणता येतो व त्याचे काही वेळा फायदेही असतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुप्तता. खातेप्रमुखाला वाटेल त्यानेच माहिती वाचावी किंवा त्यानेच बदल करावा अशी पद्धत हवी असेल तर क्लिष्ट फाईल मॅनेजमेंटची गरज पडते. पण नको असेल तर हे सर्व टाळता येते. नेमके हेच कार्यालय प्रमुखांना माहित नसते. तेंव्हा संगणक सल्लागार जो सल्ला देतील तो घेण्याकडे कल असतो. असे संगणक सल्लागार चांगली सिस्टीम डिझाईन नक्कीच तयार करून देऊ शकतात परंतु त्यामध्ये स्वतःची वेगळी गुप्तता निर्माण करतात. तसेच फी देखील भरपूर घेतात. फाईल मॅनेजमेंट मधे कांही टप्पे गुप्त ठेवले असल्यामुळे त्यामध्ये काही बदल करावयाचा

असेल तर पुन्हा त्या सल्लागारालाच मदतीला घ्यावी लागते. पूर्वी तक्ता लेखनासाठी लोटस सारखी कमी प्रगत पॅकेजेस होती तेंव्हा प्रोग्रामिंग करूनच फाईल मॅनेजमेंटची पद्धत ठरवावी लागत असे व त्यासाठी सल्लागार नेमणे योग्य म्हणता येत होते! पण फॉक्स किंवा एक्सेल साठी त्यांची गरज नाही.! हा बदल अजून
फारसा कुणी समजून घेतलेला नाही.
त-े लेखनासाठी विंडोज अंतर्गत एक्सेल पॅकेज हल्ली फार सोईचे झाले आहे. याचा उपयोग करून नवीन फाईल तयार करावयाची आहे असे संगणकाला सांगावे पण लागत नाही. पँकेज उघडल्यावर लगेच उभ्या आडव्या रेघा आखून तयार असलेला एक चौकोनी कोरा तक्ता समोर येतो. आपण रजिस्टरवर माहिती भरतो त्याचप्रमाणे या तक्त्यातील पहिल्या ओळीत प्रत्येक कॉलम मधे त्या त्या कॉलमचे शीर्षक आपण लिहायचे उदा. एखाद्या जिल्ह्यात तालुकावार व माहवार पडलेल्या पावसाची माहिती लिहायची असेल तर पहिल्या कॉलमला अनुक्रमांक, दुस-या कॉलमला तालुक्याचे नाव, तीन ते चौदा या कॉलम्सना जानेवारी ते डिसेंबर अशी महिन्यांची नावे व पंधराव्या कॉलममध्ये एकूण पाऊस असे शीर्षक देता येते. यातल्या कुठल्याही कॉलमची
रुंदी त्या कॉलममध्ये भराव्या लागणा-या माहितीप्रमाणे लहान मोठी करता येते. अशा प्रकारे दर ओळीत त्या त्या तालुक्यात दर महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी लिहिता येते. नको असेल तेव्हा पावसाची चारच महिन्याची माहिती ठेवून इतर माहिती पुसून टाकता येते. किंवा प्रिंट काढताना त्या माहितीची गरज नसेल तर ती माहिती वाचू नको असे संगणकाला सांगता येते. पुढे मागे कांही कारणाने हेच त-े उभ्या कॉलममधे तालुके व आडव्या ओळीत महिन्यांची नावे असे हवे असेल तर एक इन्व्हर्जनचा आदेश देऊन ते उलट-सुलट करता येतात. ज्या महिन्यांची माहिती उपलब्ध नसेल त्या ठिकाणी ज््र अशी खूण टाकल्यास व नंतर कधीही फक्त हीच खूण असलेली माहिती समोर दाखव असे सांगितल्यास संगणक तेवढीच माहिती दाखवितो. पुढे मागे गरज वाटल्यास या मध्ये हवे तेवढे जादा कॉलम कुठेही घुसवता येतात. तसेच ओळीही घुसविता येतात. म्हणून मध्येच आपल्याला सरासरी पाऊस किती किंवा मागील वर्षाचा एकूण पाऊस किती त्यांची तुलना इ. माहिती देखील त्या महिन्याजवळ नव्या कॉलम मध्ये भरता येते. गरजेप्रमाणे आपण शंभर, दोनशे कॉलमचा तक्ता देखील तयार करू शकतो. हा तक्ता प्रिंटरवर किंवा ए-४ कागदावर प्रिंट होईल कां या प्रश्नाचे एक उत्तर म्हणजे प्रोग्रामींग करून. परंतु दुसरे सोपे उत्तर जे कर्मचा-यांच्या हातात रहाते, ते असे की, कागदावर बसतील एवढेच कॉलम आधी प्रिंट करावयाचे व पुढील कॉलम दुस-या कागदावर प्रिंट करावयाचे व दोन्ही कागदांना सेलो टेपने चिकटवायचे. हे ज्या कार्यालयात चालते तेथील कर्मचा-यांना मोठे प्रोग्रामिंग शिकावे लागत नाही. किंवा प्रोग्रामिंग येत नाही म्हणून तज्ज्ञ सल्लागारासाठी अडून रहावे लागत नाही. मात्र मुळात तक्ता लेखनासाठी निघालेल्या नवीन पँकेजेसवर असणारी सुविधा ज्या शासकीय कार्यालयांना माहिती असेल तेच हा वापर करू शकतील.
संगणकाचा वापर करताना कार्यालयातील जास्त महत्वाच्या बाबींची माहिती संगणकावर भरून ठेवण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे कोणालाही वाटेल. परंतु फारशी महत्वाची बाब नसूनही ज्या एका बाबीवर सवं कार्यालयांचा वेळ मोठया प्रमाणात खर्च होतो ती बाब म्हणजे टपाल. त्याचे शाखा निहाय, क्लार्कनिहाय वाटप, त्यातील महत्वाचे मुद्दे तातडीने हाताळण्यासाठी ठेवावी लागणारी वेगळी नोंद. उदा. विधानसभा प्रश्न, शासन संदर्भ, वगैरे वगैरे. या मधे कर्मचा-यांचा खूपसा वेळ जातो. कार्यालयात आलेल्या प्रत्येक टपालाची नोंद सामान्यपणे ४ ते ६ ठिकाणी होत असते. म्हणजे तेवढया लोकांचा वेळ जात असतो. म्हणून टपाल ही तशी क्षुल्लक बाब वाटत असूनही मी नाशिकला कमिश्नर असतांना त्यांत लक्ष घातले होते. सर्वांआधी आवक क्लार्कने आवक रजिस्टरला टपाल नोंदवायची पद्धत बदलून आधी फक्त आवक नंबर घालून व ज्या शाखेस द्यायचे त्या शाखेचे नाव टाकून टपालाचे शाखानिहाय वाटप करायचे  एवढेच काम आवक क्लार्ककडे ठेवले. त्याने ज्या त्या शाखेस एकूण किती

कागद दिले तेवढीच नोंद रोजच्या रोज एका तक्त्यांत घ्यायची. शाखेमधे टपाल पोचल्यावर तेथील वर्कशीट क्लार्कने या टपालाची नोंद संगणकावर एका ठरवून दिलेल्या तक्त्यात करावयाची. या तक्त्यांच्या फाईलचे संगणकीय नांव टपाल-जानेवारी टपाल-फेब्रूवारी, टपाल-मार्च अशा पद्धतीने ठेवायची. त्यामुळे फक्त एखाद्या महिन्याचे टपाल हवे असल्यास नेमके तेव्हढेच संगणकाकडून प्राप्त करून घेणे शक्य होते. जमाबंदी आयुक्त कार्यालयात सुमारे ८० वर्कशीट क्लार्क आहेत. या सर्वांना आपआपले टपाल संगणकावर टाकण्यासाठी सकाळी एक ते दीड तास पुरतो. यासाठी कार्यालयात असलेल्या संगणकावर नंबर, रांग लावावी लागली ! मात्र बारा बाजेपर्यत प्रत्येक क्लार्कचे काम निश्च्िातपणे पूर्ण होत होते. या तक्त्यांमधील सर्व कॉलम सामान्यपणे शासकीय कार्यालयांत इनवर्ड रजिस्टरला जे कॉलम असतात ते, अधिक वर्कशीट रजिस्टरला काही जास्त कॉलम लागतात ते, अधिक माइया वैयक्तिक मॉनिटरींगसाठी मला दोन तोन जादा कॉलमची आवश्यकता भासली ते, अशा प्रकारे एकूण कॉलम ठरविण्यात आले. हे कॉलम ठरविण्यासाठी संपूर्ण ऑफिस स्टाफ व अधिका-यांची बैठक घेतली जेणेकरुन या कामाचे महत्व सर्वांना कळू शकले. माझे नवे कॉलम - उदा जिल्हा व गांवाचे नांव का गरजेचे होते ते देखील सर्वांना चर्चेत पटवून दिले.
वर्कशीट क्लार्कने स्वतः आपल्या टपालाची नोंद करून एक प्रिंट आउट काढायचा व तो आपल्या वर्कशीट रजिस्टराला फाईल करायचा, वर्कशीट रजिस्टर हाताने लिहायचे नाही असा कडक नियम केला. दिवसा अखेरीस आवक क्लार्क त्या तारखेस झालेल्या सर्व टपालाच्या नोंदी एका फ्लॉपी डिस्कवर एकत्रित करून त्याचे एकत्रित प्रिंट आउट घेतो व ते आपल्या इनवर्ड रजिस्टरमध्ये फाईल करतो. या पद्धतीमुळे आवक क्लार्कचा बराच वेळ वाचू लागला. महत्वाचे संदर्भ वेगळ्या रजिस्टरमध्ये ठेवण्याची जबाबदारी ज्या त्या अधिका-याची असते. उदा. एखाद्या अधिका-याकडे लोकआयुक्त संदर्भ, विधान सभा प्रश्न असे महत्वाचे संदर्भ असतात त्यासाठी त्या अधिका-यांनी आठवडयातून एकदा एकत्रित टपालामधून द्मदृद्धद्य हा आदेश वापरून आपआपल्या विषयापुरते टपाल मूळ फाईलमधून संगणकावर वेगळे काढावयाचे व त्याचे प्रिंट घेऊन ते आपल्या रजिस्टरला फाईल करावयाचे परंतु कोणतीही नोंद हाताने नोंदवायची नाही ! त्यामुळे त्यांचे देखील फक्त दर आठवडयाचे एक प्रिंट आऊट घेऊन काम भागत आहे.
दर आठवडयांस शिलकी प्रकरणांचा सारांश  काढून तो वरिष्ठांना दाखविला जातो. हे बरेच किचकट काम असते या पद्धतीत मी फरक केला. वर्कशीट क्लार्कने त्याच्या दर महिन्याच्या टपाल फाईलवर एक कागद लावून त्या कागदावर पुढील दर महिन्यास वजा झालेली प्रकरणे लिहून काढायची. अशा प्रकारे जेंव्हा सर्व प्रकरणे संपतील त्या वेळी त्या महिन्याचे  रजिस्टर ग़्त्थ्  होईल. उदा. जानेवारी महिन्यातील संपूर्ण प्रिंट आउट पैकी एक मार्चपर्यत किती प्रकरणे निकाली निघाली, एक एप्रिलपर्यत किती निकाली निघाली हा आढावा टपाल जानेवारी या फाईलवरच सुरवातीला ठेवायचा त्यामुळे जानेवारीत आलेल्या सर्व टपालापैकी एकूण एक प्रकरणे निकाली निघण्यासाठी जून महिना उजाडतो की सप्टेंबर, त्यावरून त्या क्लार्क व सेक्शन ऑफिसरची कार्यक्षमता दिसून येते. कधीतरी, कोणत्यातरी क्लार्कची जुन्या महिन्यातील फाईल मागवून ती संपूर्ण निकाली झाली किंवा नाही हे मी तपासत असे. त्यामुळे माइया अगोदर ही तपासणी करणे डेस्क ऑफिसर व सेक्शन ऑफिसर याना भाग पडत असे। म्हणूनच संगणकावर क्लार्क ने काय केले हे मला कळले नाही अशी भूमिका त्यांना घेता येत नसे. या मुळे आपोआपच त्यांची देखील संगणकाबाबतची जाण वाढली. याचा महत्वाचा फायदा असा झाला की, पुढे पुढे सर्व डेस्क ऑफिसर व सेक्शन ऑफिसर स्वतः पुढाकार घेऊन त्यांना मॉनीटरींगला सोईचे जाईल अशा प्रकारचे कित्येक बदल संगणकाच्या तक्त्यात करून घेऊ लागले. त्या मध्ये मला स्वतःला लक्ष घालण्याची गरज मागे पडली.

आवक टपालाची माहिती संगणकावर टाकल्याने माझी खास सोय झाली. त्यात आम्ही टाकलेले कॉलम म्हणजे पत्र लेखकाचे नांव, गांव, त्याची तारीख, त्याचा जिल्हा, विभाग, आपल्याकडील तारीख, वर्कशीट कर्मचा-याचे नाव, विषयाचा सारांश, पत्राचा संदर्भ, उदा. लोकआयुक्त संदर्भ, शासकीय संदर्भ, विधानसभा संदर्भ इत्यादि साठी 'संदर्भ' नांवाचा वेगळा एक कॉलम, त्याचप्रमाणे पत्राचे स्वरूप उदा. पेन्शन, थकलेले बील, रजा, कार्यालयाविरूद्ध तक्रारी, असे सुमारे २५ प्रकार सॉर्ट करण्यासाठी 'स्वरूप' नांवाचा वेगळा एक कॉलम, त्यानंतर आपल्या कडून झालेली संक्षिप्त कारवाई, त्याची तारीख, असे कॉलम केले. खास करून संदर्भ व स्वरूप या दोन कॉलमचा मला मॉनीटरींगसाठी खूप फायदा झाला. कारण स्वरूप या कॉलममध्ये निवडक २५ शब्दापैकी एकच शब्द लिहीला जातो. परंतु मला फक्त पेंशन या विषया संबंधात माहीती वेगळी काढून पाहिजे असेल तर संगणकाला तेवढी माहिती वेगळी देण्यास सांगता येते. याच प्रमाणे जिल्हावार वर्गवारी
केल्यास कोणत्या जिल्हयातून जास्त टपाल येते ते कळू शकते. वर्कशीट वार वर्गवारी केल्यास कोणत्या क्लार्कला जास्त व कोणाकडे कमी येते हे ही कळू शकते. अशा कित्येक बाबींवर लक्ष देणे संगणकामुळे सोईचे होते.
टपालाच्या फाईलला नाव देताना वर्ष संपल्यावर काय करावयाचे याचे उत्तर खूप सोपे आहे. मागील वर्षाचे तीन तीन महिन्याचे टपाल एकत्रित करून वेगळया फ्लॉपी वर काढून घ्यावयाचे व संगणकावर पुसून टाकायचे. किंवा संपूर्ण वर्षाचे टपाल एखाद्या सीडी मध्ये ठेवायचे अशा त-हेने उलटून गेलेल्या प्रत्येक वर्षासाठी ४ फ्लॉपीवर सर्व टपाल भरून ठेवायचे व नवीन वर्षासाठी पुन्हा एकदा टपाल-जानेवारी असे सोपे सुटसुटीत नाव नोंदवायचे.
------०००--------------
गद्य लेखनासाठी फार पूर्वी इंग्रजी भाषेसाठी वर्डस्टर हे पॅकेज लोकप्रिय होते. आता सरसकट वर्ड हे पॅकेज वापरतात तर शब्दरत्न, अक्षर इ. पॅकेजेस मराठीसाठी ती ब-याच कार्यालयात वापरली जात. १९९० मध्ये पुण्याच्या सी डॅक या शासकीय संस्थेने जीस्ट नावाची एक प्रणाली विकसीत केली. तिला ख-या अर्थाने आदेश प्रणाली म्हणता येणार नाही. मात्र ही प्रणाली डॉस या आदेश प्रणालींच्या जोडीने काम करू शकते. संगणकावर वर्ड वापरून गद्य लेखन किंवा फॉक्स प्लस वापरून तक्तालेखन करावयाचे असल्यास फक्त टॅब या एका कळीचा वापर करून हवे ते अक्षर देवनागरीत व हवे ते अक्षर इंग्रजीत लिहीता येते. परंतु जीस्ट ही प्रणाली विंडोज या आदेश प्रणालीच्या जोडीने काम करू शकत नसल्याने इझम ही नवीन प्रणाली विंडोजच्या जोडीने काम करण्यासाठी विकसीत केली आहे. माझ्या अनुभवावरून जीस्ट व इझम चा वापर आपल्याला कार्यालयांना करण्यासारखा आहे. यांच्या जोडीने लीप ऑफिस हे नवे सॉफ्टवेअर देखील सी-डॅक ने बाजारात आणले आहे. ते जास्त सुटसुटीत आहे. त्याने आपल्याला वेगवेगळया वळणाची अक्षरे काढता येतात आणी हे सर्व शिकायला फक्त दोन तास पुरतात अगदी नविन क्लार्कला देखील मराठी टाइपिंगची वेगळी प्रॅक्टीस करावी लागत नाही. त्यामुळे हे अधिका-यांना वापरायला खूप छान पॅकेज आहे.
खूप कर्मचा-यांना हे माहित असते की, गद्य लेखनाच्या पॅकेजचा उदा० वर्डचा वापरही तक्ता लेखनासाठी केला जाऊ शकतो व ते तसे करतात. मात्र तक्ता लेखनाचे पॅकेज वापरून तयार केलेल्या तक्त्यांना मी बुद्धीमान त-े व वर्ड पॅकेज वापरून तयार केलेल्या तक्त्यांना मी ढ त-े असे म्हणते. याचे कारण स्पष्ट आहे. गद्य लेखनाचे पॅकेज वापरून केलेल्या तक्त्यावरून संगणकाला माहिती हुडकून काढण्यासाठी सॉर्ट या आदेशचा वापर करता येत नाही. त्यामुळे फाईल मॅनेजमेंट, फक्त हवी ती माहिती बाजूला काढणे इत्यादि गोष्टी गद्य लेखन पॅकेजच्या द्वारे होऊ शकत नाही. उदा. जिल्ह्याचे नाव असा कॉलम असेल व सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली, पुणे, नांदेड, सातारा, कोल्हापूर, नाशिक अशी एका खाली एक जिल्ह्यांची नावे असतील तर एक्सेल वापरून केलेल्या तक्त्यांत फक्त सांगली जिल्ह्याबाबत माहिती वेगळी काढून दे असे सांगितल्यास संगणक फक्त अनु.क्र.

२,४,९ वरील माहिती मॉनीटरवर किंवा प्रिटरवर वेगळी देऊ शकतो. हाच तक्ता वर्ड पॅकेजमध्ये केल्यास फक्त सांगली जिल्ह्याची काढून दे असा आदेश संगणकाला समजत नाही. कित्येक कार्यालयांना हे माहित नाही. मला खूप कार्यालयांमधे वर्ड पॅकेजमध्ये त-े तयार करून त्यावर प्रचंड प्रमाणात माहिती भरून ठेवलेली आढळली. परंतु सुबक प्रिंट आऊट निघणे या खेरीज त्यांचा दुसरा काही उपयोग नसतो. या मुळेच शासकीय कार्यालयात संगणकावर खूप काम चाललेले आहे, खूप माहिती भरलेली आहे, असे चित्र जरी दिसले तरी त्या माहितीचा वापर हवी असलेली थोडी माहिती चटकन बाजूला काढणे व त्यामुळे चटकन योग्य निर्णय घेता येणे यासाठी केला जात नाही. या पद्धतीत पर्यवेक्षीय अधिका-यांना संगणकावरील माहितीचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे संगणकाबाबत त्यांचा उत्साह दिसून येत नाही.
------०००--------------
खरेतर केंद्रशासन व राज्यशासनाने संगणकाचा प्रसार व प्रचार शासकीय कार्यालयात जोमाने व्हावा म्हणून ग़्क्ष्क्  ही वेगळी संस्था निर्माण केली. संगणकाचा बराचसा वापर मी तिथेच शिकले. परंतु दुर्देवाने असे म्हणावे लागते की ग़्क्ष्क् चा दृष्टीकोण व अप्रोच बदलणे गरजेचे आहे.  दहा वर्षापूर्वीच्या काळात फाईल मॅनेजमेंट साठी करावे लागणारे प्रोग्रामिंग कठीण होते. आता मात्र एक्सेल हे पँकेज फार सोपे असते. ते शासकीय कर्मचा-यांना फार लवकर शिकवता येते. हा बदल ग़्क्ष्क् ने विचारात घेतला नाही. शिवाय एन.आय.सी ने शासकीय कर्मचा-यांचे प्रशिक्षण ही त्यांची जबाबदारी म्हणून स्वीकारली नाही. त्या ऐवजी शासकीय कार्यालयांचे सल्लागार अशी भूमिका स्वीकारली. हा सल्ला देताना कर्मचा-यांच्या कामाची सोय किती हा विचार महत्वाचा मानण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टीने जास्त परफेक्ट व गुप्त सिस्टम पुरवणे हे ध्येय मानले ! त्यामुळे सर्व साधारणपणे फॉक्सप्लस किंवा एक्सेल या पॅकेज वापर करून जी माहिती साठविण्याचे काम एखाद्या कार्यालयात एका दिवसात शिकवून सुरू करता येते त्यासाठी एन.आय.सी. ने सिस्टीम डिझाईनचा आग्रह धरून काही महिने घेतले. शिवाय कार्यालयातील एक दोन व्यक्तीनांच माहिती कशी भरावी हे शिकवण्याचा मर्यादीत हेतु डोळ्यांसमोर ठेवला. इथे हे लक्षांत घ्यायला हवे की माहिती कशी भरावी या साठी कांहीच शिकावे लागत नाही, ती कशी साठवावी व बाहेर कशी काढली असता त्यातून चांगले मॉनिटरिंग होऊ शकते हेच शिकावे लागते! कर्मचा-यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांच्या पातळीवर जेवढे शिकवणे शक्य आहे ते सर्व शिकवले पाहिजे हा विचार मला जास्त महत्वाचा वाटतो. यामधे ग़्क्ष्क् वर टीका करणे हा उद्देश नाही. माझ्या मते कार्यालयांत जशी साक्षरतेची गरज आहे व सर्व मंडळी साक्षर असली तरच फाईली मागे पुढे सरकू शकतात त्याचप्रमाणे संगणकाचे कामही सर्वाना येणे गरजेचे आहे. त्याच बरोबर त्यांना त्यांच्या सोईने फाइल मॅनेजमेंटच्या डिझाईनमध्ये हवा तो बदल करू देणे गरजेचे आहे. कित्येक कार्यालयांमध्ये त-े लेखनासाठी विशिष्ट डिझाईनचा आग्रह धरला जातो. त्यामुळे त्या त्या कार्यालयात संगणकाचा वापर मर्यादित राहीला आहे. त्याऐवजी तुम्हाला हवे तसे डिझाईन करा असे सांगितल्यास कर्मचारी आपोआप योग्य डिझाईन कसे करावे ते शिकतात, व शेवटी एक स्टॅण्डर्ड डिझाइनच तयार होते पण ते कर्मचा-यांनी स्वतः बसवलेले असते म्हणून ते त्यांना त्यांचे स्वतःचे वाटते.
------०००--------------
एकविसाव्या शतकाकडे जातांना संगणक हे आपल्या सर्वाना लाभलेले एक उत्तम यंत्र आहे. ते शिकण्यासाठी व वापरण्यासाठी फार मोठे वैज्ञानिक सर्टीफिकेट नसले तरी शासकीय कार्यालयांची गरज भागण्यापुरते प्रशिक्षण सर्वानाच देणे शक्य आहे. पण त्याआधी शासन किंवा कार्यालय प्रमुखाने दोन पर्यायांपैकी निवड करायची आहे. पहिला पर्याय म्हणजे मोठया संख्येने कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना झेपेल एवढेच, तरीही संगणक वापरण्याची गुरूकिल्ली त्यांच्याच हाती राहील एवढे शिक्षण देणे. दुसरा पर्याय म्हणजे काही

निवंडक कर्मचा-यांना माहिती भरण्याचे काम देऊन कार्यालयातील ढीगभर माहिती त्यांचेकडून संगणकावर भरून घ्यावयाची. परंतु ही माहिती संगणकावर ठेवण्याची पद्धत व संगणकातून माहिती बाहेर काढण्याची पद्धत मात्र अतिशय गुप्त पातळीवर ठेऊन त्याचा उपयोग फक्त सल्लागारा मार्फतच व प्रशासनाच्या वरीष्ठ अधिका-यांनी करावयाचा. माझे वैयक्तिक मत असे आहे की, प्रशासकीय कामाचा उठाव वेगाने करावयाचा असेल व मुख्य म्हणजे त्यात कर्मचा-यांचा सहभाग व आपुलकी टिकवून ठेवायची असेल तर पहिला पर्याय निवडणे हेच सर्वथा योग्य. मी आतापर्यंत माझ्या सर्व कार्यालयांत पहिला पर्यायच निवडला.
------------------------------------------------------------------------------------